विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेचा वर्धापन दिन गाजला, तो दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या तडाखेबंद भाषणांमुळे. मुंबईतील षण्मुखानंद हॉल येथे ठाकरेंच्या शिवसेनेचा, तर वरळी डोम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन साजरा झाला. यावेळी, उद्धव ठाकरेंनी भाजपला लक्ष्य करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरही जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना चॅलेंजही दिले. Eknath Shinde Shiv Sena Anniversary
पण दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावरुन ठाकरेंना लक्ष्य केले. लोकसभा निवडणुकीत उबाठापेक्षा आपल्याला अधिक यश मिळाले. म्हणजे जनतेच्या कोर्टात न्याय झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या आणि आपल्या शिवसेनेच्या मतांची तुलनात्मक आकडेवारीच वाचून दाखविली.
मशिदींमधून काढलेल्या फतव्यांमुळे मुस्लिम वस्त्यांमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 99 % टक्के मते मिळाली. मूळ शिवसेनेला सिंगल डिजिटमध्ये मते मिळाली. फतव्यांच्या मतांवर ठाकरेंची शिवसेना जिंकली, पण बाळासाहेबांच्या शिवसेनेचा विजय सगळीकडे ठासून झाला. कारण उबाठाचा स्ट्राईक रेट 42 %, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट 47 % आहे. आपण ठाणे संभाजीनगर मधले बालेकिल्ले दोन दोन लाखांच्या फरकाने जिंकले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
गिरे तो भी टांग उपर
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत 13 जागांवर आपण आणि उद्धव ठाकरे समोरासमोर लढलो. त्यापैकी, आपण 7 जागा जिंकलो. मग, त्यांच्यापेक्षा सरस कोण? खरी शिवसेना… बाळासाहेबांची शिवसेना कोणाची, असा सवाल करत जनतेनं आपल्याला कौल दिल्याचं शिंदेंनी म्हटले. ग्रामपंचायतीमध्येच जनतेने ट्रेलर दाखवलेला, आपले 2200 सरपंच निवडून आले होते. देशातील लोकसभा निवडणुकांच्या जागांचा विचार केल्यास काँग्रेस काठावर पण पास नाही झाली. पण उन्माद इतका की जणू देशात सरकार आले आणि दुसरीकडे उबाठाजीत का जश्न मना रही है. गिरे तो भी टांग उपर…!!, असे म्हणत शिंदेंनी निवडणुकांवरील विजयी सेलिब्रेशनवर भाष्य केले.
दक्षिण मुंबईत यामिनी जाधव यांचा पराभव झाला. कशाच्या जीवावर कोणाच्या मताने तिथे विरोधी उमेदवार जिंकले??, राहुल शेवाळे यांचेही असेच झाले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी यामिनी जाधव यांच्या मतदारसंघातील काही मतदान केंद्रावर पडलेल्या मतांची आकडेवारीच वाचून दाखविली. त्यामध्ये, शिवसेना शिंदेंच्या उमेदवारास केवळ 4 आणि 5 मतं मिळाली होती. त्या तुलनेत महाविकास आघाडीला 700 ते 800 पार एवढी मतं होती. यावरुन मुस्लीम मते कोणाला मिळाली??, हे सर्वांना माहिती आहे, असेच शिंदेंनी सूचवले. तसेच ईव्हीएमच्या मुद्द्यावर भाष्य करताना, या पराभवांचा दाखलाही दिला. ईव्हीएम हॅक केले असते, तर यामिनी जाधव अन् राहुल शेवाळेही निवडून आले असते, असा टोला शिंदेनी हाणला.
ईव्हीएमवरुन शिंदेंचा पलटवार
महाविकास आघाडीतील नेत्यांकडून ईव्हीएम मशिनवर प्रश्न उपस्थित केले गेले. मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातील रवींद्र वायकर यांच्या विजयावर भाष्य करत शिंदेंनी ईव्हीएमवरुन विरोधकांना टोला लगावला. गोवंडी, ट्रॉम्बे, धारावी, अनुशक्तीनगर भागात आपला लीड गेला. तिथे कोणता मोबाईल फोन लाऊन ईव्हीएम हॅक केलं होतं का?, असा सवाल उपस्थित करत रवींद्र वायकर यांच्या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांवर पलटवार केला. येथील मतदारसंघात आम्ही संशय घेतला नाही, कोणता OTP टाकला हे आम्ही विचारलं नाही. वायकर यांचा विजय जनतेचा विजय आहे, हा मेरिटवर काढलेला विजय आहे, खऱ्या शिवसेनेचा विजय आहे, असे म्हणत रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघात सुरू असलेल्या वादावरुनही शिंदेंनी शिवसेना ठाकरे गटावर पलटवार केला. तसेच, उबाठा हा खोटा आणि रडा पक्ष आहे, त्यांना रड्या गट बोलू, असेही शिंदेंनी म्हटले.
उबाठाचे हात थरथरले का नाहीत
उबाठा आणि काँग्रेस दोघेही फतव्यांच्या एकगठ्ठा व्होट बँकेमुळे निवडून आले, सत्तेसाठी बाळासाहेबांचे विचार सोडणारे ते लाचार आहेत. काँग्रेसने बाळासाहेबांच्या मतदानाचा अधिकार काढून घेतलेला, मग काँग्रेसला मतदान करताना उबाठाचे हात थरथरले का नाहीच. आता, तुम्ही विचारांचे वारसदार कसे होऊ शकतात, असे म्हणत शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला.
आणखी 3 – 4 जागा जिंकलो असतो
धनुष्यबाण पेलण्याची हिंमत मनगटात लागते, ते आपल्या शिवसेनेत आहे. म्हणून धनुष्यबाणाला लोकांनी मतदान केले. एवढी कसली लाचारी. बाळासाहेबांच्या विचारांना तुम्ही तिलांजली दिली. लोकसभेच्या आणखी तीन चार जागा नक्की जिंकलो असतो. आपण का जागा हरलो ते आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यात जाऊ इच्छित नाही. महायुती आपल्याला ताकदीने पुढे न्यायाची आहे. या महायुतीत मी मुख्यमंत्री आहे. म्हणून माझी जबाबदारी जास्त आहे. ही जबाबदारी मी पार पाडेन याचा विश्वास मी देतो. या वावटळीमध्ये शिवसेनेचा मूळ जो आधार आहे, जो मतदार आहे तो दुसरीकडे गेला नाही. आपल्याकडे वळला, याचे उदाहरण शिवसेनेचे 19 % मतदार होते, त्यापैकी 14.5 % मतदार हे आमच्या शिवसेनेकडे आले आणि 4.5 % मते तिकडे राहिली. मग इतर मते कशी आली, कुठून आली??, उमेदवार कसे जिंकले?? हे महाराष्ट्राला माहिती. पण ही तात्पुरती आलेली सूज आहे, पण ती विधानसभा निवडणुकीत उतरेल, असा टोला शिंदेंनी हाणला.
Eknath Shinde Shiv Sena Anniversary
महत्वाच्या बातम्या
- भाजपच्या अनपेक्षित अपयशाच्या दुष्परिणाम; संसदेभोवती घट्ट आवळला घराणेशाहीचा फास!!
- भारतीय नौदलाच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सहा पाणबुड्यांचा समावेश
- राहुल गांधी रायबरेली ठेवणार, वायनाड सोडणार; प्रियांका गांधी तिथून लढणार!!
- अर्थसंकल्प 2024: अर्थमंत्री सीतारामन अर्थसंकल्पापूर्वी उद्योग संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार