• Download App
    इस्रायल-हमास युद्धादरम्यान, भारताने इजिप्तमार्गे गाझामधील नागरिकांसाठी पाठवली मदत During the Israel Hamas war India sent aid to civilians in Gaza through Egypt

    इस्रायल-हमास युद्धादरम्यान, भारताने इजिप्तमार्गे गाझामधील नागरिकांसाठी पाठवली मदत

    परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची याबाबत माहिती दिली आहे

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास  यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान, भारताने गाझातील लोकांसाठी मानवतावादी मदत पाठवली आहे. इस्रायलने हमासवर केलेल्या प्रत्युत्तरादाखल कारवाईमुळे गाझातील लोक सध्या मोठ्या संकटाला तोंड देत आहेत. त्यामुळे भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. During the Israel Hamas war India sent aid to civilians in Gaza through Egypt

    परराष्ट्र मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ट्विट केले की, भारत गाझामधील लोकांना मदत पाठवत आहे. ते म्हणाले की पॅलेस्टाईनच्या लोकांसाठी सुमारे 6.5 टन वैद्यकीय मदत आणि 32 टन आपत्ती निवारण साहित्य घेऊन IAF C-17 विमान इजिप्तच्या एल-अरिश विमानतळाकडे प्रस्थान केले.

    गाझाला पाठवलेल्या मदतीमध्ये जीवनरक्षक औषधे, शस्त्रक्रियेच्या वस्तू, तंबू, स्लीपिंग बॅग, ताडपत्री, स्वच्छता सुविधा, पाणी शुद्धीकरण गोळ्या आणि इतर आवश्यक वस्तूंचा समावेश आहे.  गाझामध्ये शनिवारपासून मानवतावादी मदत पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.  मानवतावादी मदत गाझापर्यंत पोहोचण्यासाठी इजिप्तने रफाह सीमा उघडली आहे. सुरक्षा स्रोत आणि इजिप्शियन रेड क्रिसेंटच्या अधिकाऱ्याने एएफपीला सांगितले की, इजिप्तमधून युद्धग्रस्त गाझा येथे मानवतावादी मदत घेऊन जाणारे ट्रक शनिवारी रफाह सीमेवरून जाऊ लागले आहेत.

    During the Israel Hamas war India sent aid to civilians in Gaza through Egypt

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    President Droupadi Murmu : राष्ट्रपती भवनात शौर्य पुरस्कार सोहळा; मुर्मू यांनी लेफ्टनंट जनरल रणजीत सिंग यांना अति विशिष्ट सेवा पदकाने सन्मानित केले

    New Delhi EV Policy : दिल्लीत ईव्हीवर रोड टॅक्स-नोंदणी मोफत; ₹30 लाखांपर्यंतच्या गाड्यांवर सूट; 2028 पासून पेट्रोल-सीएनजी टू-व्हीलर्स बंद होतील

    Foreign Universities : 15 परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस उघडण्याची मंजुरी; ऑगस्टपासून पहिली बॅच; परदेशी पदवी मिळेल, शिक्षणाचा खर्च होईल 30-40% कमी