तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री आणि द्रमुक नेते केएन नेहरू यांनी बिहारमधील लोकांवर वांशिक भाष्य केले आहे .
विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तामिळनाडू महानगरपालिका प्रशासन मंत्री आणि द्रमुक नेते केएन नेहरू यांनी बिहारमधील लोकांवर वांशिक भाष्य केले आहे .नेहरूंच्या या विधानामुळे मोठा वाद निर्माण होऊ शकतो. DMK leader insults Biharis, says ‘less intelligent’ people are snatching our jobs
असे सांगितले जात आहे की, मंत्री बिहारच्या लोकांना तामिळांपेक्षा कमी हुशार असल्याचे सांगत होते. तसेच बिहारमधील लोक तामिळनाडूत येऊन स्थानिक रहिवाशांच्या नोकऱ्या हिसकावत असल्याचा आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी पेगासस हेरगिरी प्रकरणाच्या संसदीय समितीत समाविष्ट झालेल्या भाजपा खासदार निशिकांत दुबे यांनी टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांना ‘बिहारी गुंडा’ म्हणून संबोधले होते. या प्रकरणाचा वाद अद्याप मिटलेला नाही.माहितीनुसार केएन नेहरूंनी 25 जुलै रोजी हे विधान केले.
त्यावेळी ते तिरुचिराप्पल्लीतील द्रमुक कार्यालयातून रोजगार शिबिराला संबोधित करत होते. सुमारे आठवडाभर चाललेला हा कार्यक्रम 23 जुलै रोजी सुरू झाला, ज्यामध्ये केएन नेहरू 25 जुलै रोजी सामील झाले.
तेव्हा के.एन. नेहरू आपल्या भाषणादरम्यान म्हणाले की, बिहार आणि उत्तर भारतातील लोक तामिळनाडूमधील तामिळ लोकांची नोकरी रोखत आहेत. ते स्थानिक बँका आणि इतर ठिकाणी तमिळ आणि इंग्रजी न कळता काम करत आहेत. द्रमुक नेत्याने आपल्या भाषणात म्हटले की बिहारची जनता तामिळ लोकांपेक्षा कमी हुशार आहे.
केएन नेहरूंनी त्यांच्या भाषणादरम्यान राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, लालू यादव रेल्वे मंत्री असताना त्यांनी बिहारच्या लोकांनी रेल्वेमध्ये खालच्या स्तरावरील पदे भरली होती.बिहारमधील सुमारे चार हजार लोक सध्या त्रिची येथील दक्षिण रेल्वेच्या गोल्डन रॉक कार्यशाळेत कार्यरत आहेत. बिहारमध्ये रेल्वेमध्ये जास्तीत जास्त गेटकीपर आहेत. हे सर्व लालू प्रसाद यादव यांच्यामुळेच झाले आहे. जेव्हा ते रेल्वे मंत्री होते, तेव्हा त्यांनी बिहारमधील त्यांचे सर्व सहकारी रेल्वे परीक्षेत उत्तीर्ण झाले आणि त्यांना नोकऱ्या मिळवून दिल्या. या लोकांना ना तमिळ येते ना हिंदी येते. त्यांना तमिळांसारखे मेंदूही नाही. असे असूनही ते तामिळनाडूमध्ये कार्यरत आहेत.
DMK leader insults Biharis, says ‘less intelligent’ people are snatching our jobs
महत्त्वाच्या बातम्या
- जोपर्यंत लस दिली जात नाही, तोपर्यंत मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालक अनुत्सुक
- प्रतिमा मलिन केली जात असल्याचा शिल्पा शेट्टीचा आरोप, माध्यमांविरोधात उच्च न्यायालयात धाव
- जावई तुरुंगात जातील त्यावेळी केंद्रातील सरकार पडेल, भाजपवर टीका करताना आपचा गांधी कुटुंबियांवर निशाणा
- आम्हाला काही करण्याची गरज नाही, महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधानेच पडेल, राज ठाकरे यांच्या परप्रांतियांच्या भूमिकेत स्पष्टता येत नाही तोपर्यंत एकत्र येण्यास बंधने, देवेंद्र फडणवीस यांनी केले स्पष्ट