• Download App
    कानपुर मध्ये झिका विषाणूची 14 लोकांना लागण!|'Diwali Faral' program on Vadeshwar Katta again this year; Forgetting political differences made each other's mouths sweet

    यंदाही वडेश्वर कट्ट्यावर ‘ दिवाळी फराळ ‘ कार्यक्रम ; राजकीय मतभेद विसरून केले एकमेकांचे तोंड गोड

    आहे.यंदाही ही दिवाळी फराळ परंपरा कायम राहिली.वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली.’Diwali Faral’ program on Vadeshwar Katta again this year; Forgetting political differences made each other’s mouths sweet


    विशेष प्रतिनिधी

    पुणे : यंदाच्या दिवाळीत राज्यात अनेक ठिकाणी राजकीय फटाके फुटत आहेत. दरम्यान पुण्यातल्या सगळ्या राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी एकमेकांचे तोंड गोड करत दिवाळी साजरी केली आहे. गेल्या अनेक वर्षापासून वाडेश्वर कट्ट्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमाची परंपरा सुरू आहे.यंदाही ही दिवाळी फराळ परंपरा कायम राहिली.वाडेश्वर कट्ट्याने गेली अनेक वर्षे जपलेली संवादाची परंपरा यानिमित्ताने पुणेकरांना अनुभवता आली.

    विशेष म्हणजे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी महापौर प्रशांत जगताप यांनी दिवाळी आधीच एकमेकांवर आरोप करत फटाके फोडले होते. आज वाडेश्वर कट्ट्यावर मात्र एकमेकांना लाडू भरवून तोंड गोड करत गळाभेट घेतली.



    अंकुश आण्णा व त्यांच्या टीमच्या वतीनं वाडेश्वर कट्ट्यावर दिवाळी फराळ कार्यक्रमाचं आयोजन केलं. या दिवाळी फराळाच्या निमित्ताने, मागील राजकीय मतभेद विसरून सर्वांनी एकत्र येवून, चांगल्या भावनेनं राजकारण करु’, असं मत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

    दिवाळी फराळ मागचा नेमका उद्देश काय

    ‘पुण्याची राजकीय परंपरा आहे. विचारांची लढाई ही विचारांनीच लढली जाते. आज सणाचा दिवस आहे. शेवटी निवडणूका येतात- जातात. मतभेद असावेत, मनभेद नसावेत, असा या दिवाळी फराळ मागचा उद्देश आहे.

    ‘Diwali Faral’ program on Vadeshwar Katta again this year; Forgetting political differences made each other’s mouths sweet

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Satellite : भारतात लवकरच थेट उपग्रहाद्वारे इंटरनेट; मस्क यांची स्टारलिंक 30-31 ऑक्टोबरला मुंबईत डेमो देणार

    Cricketer Azharuddin : माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन तेलंगणा सरकारमध्ये मंत्री होणार; 31 ऑक्टोबर रोजी शपथ घेणार

    राहुल गांधींनी मोदींच्या हाती आयता दिला मुद्दा; बिहारच्या निवडणुकीत “अपमान” तापला!!