आपल्याला भारतातील १०० कोटी हिंदूंच्या हृदयात हिंदू राष्ट्र हवे आहे. असंही शास्त्री म्हणाले..
विशेष प्रतिनिधी
मुझफ्फरनगर : Dhirendra Krishna Shastri प्रसिद्ध कथाकार आणि बागेश्वर धामचे पीठाधीश धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी माध्यमांशी बोलताना मुझफ्फरनगरचे नाव बदलून माँ भगवती आदिशक्तीच्या नावावर ठेवण्याबाबत बोलले आहेत.Dhirendra Krishna Shastri
धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले, आम्ही मुझफ्फरनगरच्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी मुझफ्फरनगरचे नाव बदलून लक्ष्मीनगर करण्याची प्रतिज्ञा करावी आणि यावेळी हनुमान जन्मोत्सव यात्रा काढावी. तसेच औरंगजेबाबद्दल आपले मत व्यक्त करताना म्हणाले, औरंगजेब देश तोडणार होता, बाबर आणि मुघलांच्या एकाही वंशजाचा एकही अवशेष भारतात राहू नये. या विधानाद्वारे शास्त्री मुघलांचा इतिहास आणि भारतातील त्यांचा प्रभाव नाकारण्याबद्दल बोलले.
मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांडावर प्रतिक्रिया देताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, आजच्या टीव्ही मालिका मुलांना बिघडवत आहेत. ते म्हणाले, जिथे पाऊस पडत नाही तिथे पिके नष्ट होतात आणि जिथे मूल्ये नसतात तिथे पिढ्या नष्ट होतात.
शास्त्री पुढे म्हणाले, आपल्याला सरकारवर अवलंबून राहण्याची गरज नाही, आपल्याला भारतातील १०० कोटी हिंदूंच्या हृदयात हिंदू राष्ट्र हवे आहे. मुझफ्फरनगरचे नाव बदलण्याच्या मागणीवर भर देताना ते म्हणाले की, या जागेचे नाव आई भगवती आदिशक्ती श्री लक्ष्मी मातेचे नाव असावे.
Dhirendra Krishna Shastri demands renaming of Muzaffarnagar to Lakshmi Nagar
महत्वाच्या बातम्या
- श्री तुळजाभवानी मंदिर – जागतिक दर्जाचे धार्मिक आणि सांस्कृतिक पर्यटनस्थळ होणार!
- CM Devendra Fadnavis विकासाची महागुढी उभारू या! राष्ट्रधर्म वाढवू या!
- Waqf bill विरोधात मुस्लिम संघटनांची NDA मध्ये सेंधमारी; चंद्राबाबू + नितीश कुमार आणि चिराग पासवान यांना दमबाजी!!
- Sukma : सुकमामध्ये १६ नक्षलवादी ठार, दोन सैनिक जखमी