प्रतिनिधी
गडचिरोली : छत्तीसगडच्या सीमेवर चकमकीत महाराष्ट्र पोलिसांनी 3 नक्षलवाद्यांना घातलेल्या महाराष्ट्राचे सुरुवातीचे गाव असलेल्या दामरंचाच्या गावाला उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन तेथे जवानांचे अभिनंदन केले आणि त्यांचे मनोधैर्य उंचावले. Devendra Fadnavis’s visit to ground zero where 3 Naxalites were cornered by Maharashtra Police
नक्षलवाद्यांशी जिथे चकमक झाली, त्या गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील दामरांच्या गावाला फडणवीस यांनी भेट दिली. हे गाव छत्तीसगडच्या सीमेवर आणि महाराष्ट्राच्या सुरुवातीला आहे. इथे महाराष्ट्र पोलिसांनी माओवाद्यांवर फार चांगल्या प्रकारे जरब बसवली आहे. त्यांचे मनोबल वाढवणे माझे कर्तव्य आहे. इथे पोलीस पोलिसांचेच काम नव्हे तर नागरिकांपर्यंत योजना पोहोचविण्याचे काम पण करतात, अशा शब्दात फडणवीस यांनी पोलिसांचे कौतुक केले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले :
- नक्षलवाद ही विचारांची नाही, तर आता देशविरोधी लढाई आहे. इतर परकीय शक्ती आणि आयएसआय सारख्यांची मदत या नक्षलवाद्यांना आहे. लोकशाही आणि संविधान न मानणार्यांची ती लढाई आहे.
- या नक्षलवादी कारवायांमध्ये सामान्य माणसांचे बळी गेले आहेत. आदिवासी, अनुसूचित जातीच्या लोकांचे बळी गेले आहेत. लोकहिताची, व्यापक विकासाला कायम नक्षल विचारधारेने विरोध केला आहे.
- आज शहरी नक्षलवादाची सुद्धा मोठी समस्या आहे. पोलिस भरतीला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. जेव्हा स्थानिक स्तरावर नक्षलवाद्यांना यश मिळत नाही, तेव्हा ते लोकांचे ब्रेनवॉश करुन ही लढाई शहरांमध्ये लढू पाहताहेत.
- लोकशाही आणि संविधान न मानणे, हेच त्यांचे काम आहे. ही अराजकता आहे. गेल्या कालावधीत असेच एक मोठे नेटवर्क ध्वस्त करण्याचे काम आम्ही केले होते.
Devendra Fadnavis’s visit to ground zero where 3 Naxalites were cornered by Maharashtra Police
महत्वाच्या बातम्या
- Gangster Act Case : बहुजन समाज पार्टीचे खासदार अफजल अन्सारींचे लोकसभा सदस्यत्व रद्द!
- ठाकरे विरुद्ध शिंदे – फडणवीस सरकारच्या संघर्षाचा पुढचा अंक 6 मे रोजी बारसू मध्ये!!; पवारांची भूमिका सावध आणि संशयाची
- बारसू प्रकल्पासाठी आता शरद पवारांना का भेटता?, उद्धव ठाकरेंनी दाबली शिंदे – फडणवीस सरकारची नस
- मुंबईच्या वज्रमूठ सभेत ठाकरे – अजितदादा – अशोक चव्हाण यांच्या भाषणातून मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेचा विषय गायब