• Download App
    "... पण असे असूनही दक्षिणेत भाजपच्या जागा वाढतील" ; राजीव चंद्रशेखर यांचे विधान!|despite this BJPs seats will increase in the south Statement of Rajiv Chandrasekhar

    “… पण असे असूनही दक्षिणेत भाजपच्या जागा वाढतील” ; राजीव चंद्रशेखर यांचे विधान!

    लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी इतिहास रचला जाईल, असंही ते म्हणाले आहेत.


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काँग्रेसने दुहेरी आणि निवडक वृत्ती स्वीकारल्याचा आरोप केला आहे. केरळमधील तिरुअनंतपुरममधून काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे चंद्रशेखर यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जून रोजी इतिहास रचला जाईल, असा दावाही केला. केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली असून यावेळी दक्षिण भारतातून जवळपास 60 जागा मिळतील, असे ते म्हणाले.despite this BJPs seats will increase in the south Statement of Rajiv Chandrasekhar



    काँग्रेसच्या निवडणूक प्रचारशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राजीव चंद्र शेखर म्हणाले, “दक्षिण भारतात भाजप 60 जागा जिंकेल. भाजपला सध्या 39 जागा आहेत. काँग्रेसचा निवडणूक प्रचार खोटारडेपणा, खोटे व्हिडिओ आणि चुकीच्या माहितीवर आधारित आहे.” कर्नाटक, केरळ आणि तेलंगणामध्ये या लोकांनी आम्ही राज्यघटना बदलू, असे खोटे पसरवले आहे, पण असे काहीही होणार नाही. असंही चंद्रशेखर म्हणाले.

    ते म्हणाले, “लूटमार आणि खोटे बोलणे ही काँग्रेसची ओळख बनली आहे. काँग्रेसने जास्तीत जास्त घटनादुरुस्ती करून आमच्यावर आरोप केले आहेत. व्हिडीओशी छेडछाड करून खोटे पसरवणे ही काँग्रेसची रणनीती आहे. काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसी कडून आरक्षण घेऊन मुस्लिमांना देत आहे, ज हे संविधानाच्या विरोधात आहे.

    despite this BJPs seats will increase in the south Statement of Rajiv Chandrasekhar

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल