वृत्तसंस्था
पुंछ : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा पराभव निश्चित असल्याची कबुली काँग्रेसचे नेते गुलामनबी आझाद यांनी दिली असून काँग्रेस ३०० जागांचा आकडा गाठू शकणार नाही, असे म्हंटले आहे. Defeat of Congress in Lok Sabha is certain, it is impossible to get 300 seats: Ghulam Nabi Azad
जम्मू काश्मीर येथील पुंछ येथे आयोजित सभेत ते बोलत होते. दरम्यान, त्यांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसला भवितव्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. एकप्रकारे काँग्रेसने युद्धापूर्वीच हत्यारे टाकली आहेत. दोन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सपाटून पराभव झाला. पंतप्रधान मोदी यांच्या लोकप्रियता आणि अफाट विकास कामांमुळे जनतेने त्यांना भरभरून मते दिली.
आझाद म्हणाले, घटनेचे ३७० वे कलम हटविले आहे. ते पुन्हा लागू होणारे नाही. त्यासाठी लोकसभेत बहुमत लागते. ते आमच्याकडे नाही आणि भविष्यातही प्राप्त होणार नाही. त्यामुळे पोकळ आश्वासनाला भुलू नका, असा सल्ला त्यांनी जनतेला दिला.
Defeat of Congress in Lok Sabha is certain, it is impossible to get 300 seats: Ghulam Nabi Azad
महत्त्वाच्या बातम्या
- हिंगोली : ७६ किलो गांजा हळदीच्या शेतातुन जप्त ; आरोपीस अटक
- ३ ते ७ डिसेंबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार रायगड किल्ला
- हिंदुंच्या हत्याऱ्यांपुढे मस्तक झुकवणारी झुटी सेना ; तुषार भोसले यांचा घणाघात
- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे निकटवर्तीय देवेंद्र शहा यांच्या पराग मिल्क फूड्स प्रायव्हेट लिमिटेडचे ४२८ कोटींचे बोगस व्यवहार?