चक्रीवादळ म्हण्टले की काळजात धस्स होत .या वादळाच्या अनेक भयावह आठवणी कायम स्मरणात राहतात .
मात्र इथे जरा वेगळं आहे .तर या वादळाची पुर्व कल्पना असल्याने अनेक गर्भवती महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं .काहींची तर प्रसुती देखील त्या भयावह वादळा दरम्यान झाली .
आता मातृत्व जगातली सर्वात सुंदर गोष्ट आणि ती विशेष आणि कायम स्मरणात रहावी यासाठी माता पिता काहीतरी नाविन्यपूर्ण नाव आपल्या बाळाला देतात .आता बहुतांशी नावं ही त्या त्या परिस्थिति प्रमाणे दिली जातात .
असेच हटके नाव दिले आहे ‘त्या’दिवशी जन्मलेल्या बहुतांशी बाळांना .यासची अशीही आठवण.Cyclone Yaas Effect Odisha: Baby born in cyclone named ‘Yas’! 750 babies born!
विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर : सरकारी आकडेवारी नुसार ओरिसाच्या किनाऱ्यावर यास चक्रीवादळ जेव्हा घोंगावत होते त्या काळात ७५० नवे जीव जन्माला आले. अनेक पालकांनी आपल्या नवजात बालकाचे मग तो मुलगा असो की मुलगी, नाव ‘यास’ ठेवले असल्याचे समोर आले आहे. या चक्रीवादळाचे नाव ओमान मध्ये ठेवले गेले असून या फार्सी शब्दाचा अर्थ आहे मोगरा. इंग्रजी मध्ये याचा अर्थ जास्मीन असा आहे.
यातील काही बाळे यास ओरिसा किनारपट्टीवर दाखल झाले असताना जन्माला आली तर काही बाळे बालासोर जिल्हात ५० किमी दक्षिणेस असलेल्या बहानया येथे वादळ जमिनीवर धडकले तेव्हा जन्माला आली असे समजते. अनेकांनी हे वादळ कायम लक्षात राहील म्हणून बाळाचे नाव यास ठेवल्याचे सांगितले.
राज्य सरकारने वादळाचा धोका लक्षात घेऊन संबंधित भागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले होते तेव्हाच त्यात ६५०० गर्भवती महिला आहेत हे लक्षात आले होते. अगदी दिवस भरत आलेल्या महिलांना डिलीव्हरी सेंटर व अन्य स्थानिक रुग्णालयात दाखल केले गेले होते. शेल्टर होम मध्ये काही बालके जन्माला आली. बालासोर जिल्ह्यात १६५ बालके जन्मली त्यातील ७९ मुले आहेत तर ८६ मुली आहेत.
Cyclone Yaas Effect Odisha: Baby born in cyclone named ‘Yas’! 750 babies born!
महत्त्वाच्या बातम्या
- कोरोनामुळे कर्ता सदस्य गमाविलेल्या कुटुंबांसोबत सरकार, पंतप्रधानांनी दिला विश्वास, निवृत्तीवेतन तसेच विमा भरपाई मिळणार
- प्रफुल्ल पटेल यांच्या निर्णयांनी लक्षद्वीप धुमसू लागले, सर्वच राजकीय नेत्यांचा आक्षेप
- केंद्राने राज्यांना एकाकी सोडले नाही, लसीकरण मोहिमेचे डॉ. पॉल यांचे स्पष्टीकरण
- हार्वर्ड विद्यापीठ जगात पहिले, भारतात आयआयएम अहमदाबाद टॉपर
- अलिगडमध्ये विषारी दारू पिल्याने २२ जणांचा मृत्यू, २८ जणांची प्रकृती गंभीर