• Download App
    Corona hotspot in some villages in Haryana due to farmers' agitation, alleges Chief Minister Manoharlal Khattar

    शेतकरी आंदोलनामुळे हरियाणातील काही गावे कोरोना हॉटस्पॉट, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा आरोप

    शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमेजवळची हरियाणामधील काही गावं कोरोना हॉटस्पॉट झाल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचा सल्लाही दिला होता असे त्यांनी सांगितले. Corona hotspot in some villages in Haryana due to farmers’ agitation, alleges Chief Minister Manoharlal Khattar


    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनामुळे दिल्ली सीमेजवळची हरियाणामधील काही गावं कोरोना हॉटस्पॉट झाल्याचा आरोप हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण शेतकऱ्यांना आंदोलन स्थगित करण्याचा सल्लाही दिला होता असे त्यांनी सांगितले.

    खट्टर म्हणाले, मी शेतकरी नेत्यांना महिन्याभरापूर्वी आवाहन केले होते की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मागे घ्या. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा आंदोलन करता येईल. मात्र आता या आंदोलनामुळे काही गावं की कोरोनाचा हॉटस्पॉट झाली आहेत. येथील काही गावकरी या आंदोलनाच्या ठिकाणी सतत ये-जा करत असल्याने हे घडले आहे.



    हरियाणात मागील तीन दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. एक लाख सात हजार सक्रिय रुग्ण राज्यात आहेत. राज्यातील आरोग्य व्यवस्था सध्या जेवढी गरज आहे त्यासाठी पुरेशी आह, असेही खट्टर यांनी म्हटले आहे.

    दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आंदोलन सुरू आहे. सीमेवरील मोकळ्या मैदानात शेतकरी तंबूमध्ये राहत आहेत. आंदोलनातील शेतकऱ्यांची संख्या कमी असली तरी याठिकाणी लोकांची सतत येजा चालू असते. पंजाब- हरियाणा या भागातून शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असतात. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याचे म्हटले जात आहे.

    Corona hotspot in some villages in Haryana due to farmers’ agitation, alleges Chief Minister Manoharlal Khattar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे