• Download App
    काँग्रेसला धक्का! अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोईंसह 'हे' काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार Congress Shocked Ankita Dutta Bismita Gogoin along with other Congress leaders will enter BJP

    काँग्रेसला धक्का! अंकिता दत्ता, बिस्मिता गोगोईंसह ‘हे’ काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार

    आसाम भाजप युनिटने गुवाहाटी येथील राज्य मुख्यालयात पक्ष प्रवेशासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे Congress Shocked Ankita Dutta Bismita Gogoin along with other Congress leaders will enter BJP

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटा : आसाम प्रदेश युवक काँग्रेसच्या माजी प्रमुख डॉ.अंकिता दत्ता रविवारी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष श्रीनिवास बीवी यांनी आपला छळ केल्याचा आरोप अंकिता दत्ता यांनी केला आहे. 22 एप्रिल रोजी अंकिता दत्ताच्या तक्रारीवरून श्रीनिवास बीवी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    त्यांच्या तक्रारीत, अंकिता यांनी श्रीनिवास यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून “छळ” आणि “भेदभाव” केल्याचा आरोप केला आहे. पक्षविरोधी कारवायांसाठी अंकिता यांना नंतर काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकिता दत्ता आणि बिस्मिता गोगोई यांच्या व्यतिरिक्त, ऑल आसाम स्टुडंट युनियनच्या (AASU) माजी नेत्यांसह अनेकजण रविवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

    आसाम भाजप युनिटने गुवाहाटी येथील राज्य मुख्यालयात पक्ष प्रवेशासाठी एक कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉ. अंकिता दत्ताने एएनआयला फोनवरून सांगितले की, मी भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. दुसरीकडे, गोलाघाटमधील खुमताई मतदारसंघातील काँग्रेसच्या माजी आमदाराने शनिवारी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. आसाम प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांना राजीनामा पत्र पाठवले.

    Congress Shocked Ankita Dutta Bismita Gogoin along with other Congress leaders will enter BJP

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    High Court : हायकोर्टाने हैदराबाद गॅझेटच्या जीआरविरोधी याचिका फेटाळली; कोर्टाने म्हटले- याचिका पीडितांची नाही, जनहिताच्या कक्षेतही नाही

    अलंद मतदारसंघातील मतदार वगळल्याचा राहुल गांधी यांचा दावा दाव्यावर निवडणूक आयोगाने फेटाळला

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज