नवीन घोषणेनंतर बिहारमध्ये उडाली राजकीय खळबळ
विशेष प्रतिनिधी
पाटणा : Bihar assembly बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता घडामोडींना वेग येत आहे. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे, तर अनेक पक्ष मोठमोठ्या घोषणाही करत आहेत. याचा पार्श्वभूमीवर आता काँग्रेसनेही मोठी खेळी खेळली आहे.Bihar assembly
निवडणुकीत मागासवर्गीयांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राजकीय वाटा दिला जाईल, अशी घोषणा बिहार प्रदेश काँग्रेसने केली आहे. मागासवर्गीयांबबत काँग्रेसची काय भूमिका? या प्रश्नावर सदाकत आश्रमात आयोजित चर्चासत्रात काँग्रेसकडून वरील माहिती दिली गेली.
राज्याच्या विविध भागातील मागासवर्गीय समाजाचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष राजेश कुमार, सह-प्रभारी सुशील पासी यांनीही चर्चासत्रात भाग घेतला होता.
कार्यक्रमादरम्यान, पक्षाने एक ठरावही मंजूर केला. ठरावात म्हटले आहे की, काँग्रेस मागासलेल्या समुदायाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सहभागासाठी संघटित संघर्ष करेल आणि त्याला त्यांच्या राजकीय धोरणामध्ये प्राधान्य देईल. या कार्यक्रमाला प्रा. शिव जंतन ठाकूर, अली अन्वर, डॉ. के.पी. सिंह, चंद्रदेव कुमार चौधरी आणि नीलू कुमारी यांनी संबोधित केले.
याशिवाय अजय कानू, ओमप्रकाश महातो आणि प्रमोद कुमार चंदवंशी यांनीही मेळाव्याला संबोधित केले. वक्त्यांनी सांगितले की, हा कार्यक्रम केवळ एक सत्कार नव्हता तर मागासवर्गीयांचा आवाज राजकारणाच्या केंद्रस्थानी आणण्यासाठी एक निर्णायक पाऊल ठरला. कार्यक्रमादरम्यान, बिहारच्या मागासवर्गीय सेलचे नवनियुक्त अध्यक्ष शशी भूषण पंडित यांचाही सत्कार करण्यात आला.
Congress new strategy for Bihar assembly elections
महत्वाच्या बातम्या
- Baloch Army : ‘आम्ही पाकिस्तानचे सुरब शहर ताब्यात घेतले आहे’, बलुच आर्मीचा मोठा दावा
- Lalu Yadav : ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणी लालू यादव यांना मोठा धक्का!
- PF UPI : पीएफ, यूपीआय ते क्रेडिट कार्ड; १ जूनपासून पैशांशी संबंधित ‘हे’ नियम बदलणार!
- Shubanshu Shukla : भारत अवकाशात इतिहास रचणार! शुभांशू शुक्ला मे महिन्यात अंतराळ स्थानकावर होणार रवाना