• Download App
    पितृपक्षाला घाबरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार याद्या नवरात्राच्या पहिल्या माळेला जाहीर; पण त्याही तोकड्याच!!|Congress candidate lists announced on the first garland of Navratri; But that too!!

    पितृपक्षाला घाबरलेल्या काँग्रेसच्या उमेदवार याद्या नवरात्राच्या पहिल्या माळेला जाहीर; पण त्याही तोकड्याच!!

    विशेष प्रतिनिधी

    रायपूर : एकीकडे सनातन धर्माला नावे ठेवायची, दुसरीकडे त्यातल्या अंधश्रद्धाच खऱ्या मानून वाटचाल करायची ही काँग्रेसची भीतीतून आलेली “परंपरा” आहे. ती “परंपरा” जपत काँग्रेसने छत्तीसगड आणि तेलंगण विधानसभेच्या निवडणुकीत आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, पण ती देखील तोकडीच!!Congress candidate lists announced on the first garland of Navratri; But that too!!

    छत्तीसगडमध्ये भाजपने 60 पेक्षा जास्त उमेदवार जाहीर केले असताना काँग्रेसची पहिली उमेदवारी यादी फक्त 30 जणांची बाहेर आली आहे. काँग्रेसच्या छत्तीसगड प्रभारी कुमारी शैलजा यांनी आम्ही 90 उमेदवारी एकाच वेळी जाहीर करू शकतो, अशा बाता तीनच दिवसांपूर्वी मारल्या होत्या. पण प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. 90 च्या निम्मेही उमेदवार काँग्रेस जाहीर करू शकली नाही, तर फक्त 30 उमेदवारांची पहिली यादी काँग्रेसने नवरात्राच्या पहिल्या माळेला जाहीर केली. कारण कोणत्याही काँग्रेस उमेदवाराला पितृपक्षात आपले नाव जाहीर व्हायला नको होते.



    छत्तीसगड बरोबरच तेलंगणाची यादीही काँग्रेसने जाहीर केली, ती 50 उमेदवारांची आहे. त्या यादीलाही पितृपक्षाचाच अडथळा होता. पितृपक्ष संपून नवरात्राची पहिली माळ आल्याबरोबर काँग्रेसने तेलंगणातली यादी जाहीर केली. तेलंगण प्रदेश अध्यक्ष रेवंत रेड्डी कलंगुडातून निवडणूक लढणार आहेत, तर छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री टी. एस. सिंगदेव हे अंबिकापूर मधून मैदानात उतरणार आहेत. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचा मतदारसंघ अद्याप ठरायचा आहे.

    पण एकीकडे सनातन धर्माला नावे ठेवायची आणि त्यातल्या अंधश्रद्धा मात्र निगुतीने पाळायच्या हे काँग्रेसचे दुटप्पी धोरण काँग्रेसच्या याद्यांमधून प्रसिद्ध करण्याच्या दिवसातून बाहेर आले आहे.

    Congress candidate lists announced on the first garland of Navratri; But that too!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला

    भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

    ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी