flaws in PM Modi security : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून भाजप आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पवित्र भूमीवर काँग्रेसचे रक्तरंजित हेतू फसले आहेत. काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदींचा तिरस्कार करणारे आज त्यांच्या सुरक्षेला तडा देण्याचा प्रयत्न करत होते. Congress bloody intentions Unsuccessful, Smriti Irani attacks Punjab Congress CM Channi Over flaws in PM Modi security
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत झालेल्या हलगर्जीपणावरून भाजप आक्रमक झाला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी म्हणाल्या की, भारताच्या इतिहासात आज पंजाबच्या पवित्र भूमीवर काँग्रेसचे रक्तरंजित हेतू फसले आहेत. काँग्रेसमध्ये पंतप्रधान मोदींचा तिरस्कार करणारे आज त्यांच्या सुरक्षेला तडा देण्याचा प्रयत्न करत होते.
दिल्लीतील भाजप कार्यालयात प्रसारमाध्यमांना संबोधित करताना स्मृती इराणी यांनी पंजाबचे काँग्रेस सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे आणि पंजाब पोलीस हे माहीत असूनही मूक प्रेक्षक बनून राहिल्याचा आरोप केला.
पंतप्रधानांच्या सुरक्षा पथकाला जाणूनबुजून खोटे का सांगण्यात आले, असा सवाल केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांच्या सुरक्षेचा भंग करणाऱ्यांना पंतप्रधानांच्या वाहनापर्यंत कोणी आणि कसे आणले?
पीएम मोदींच्या सुरक्षेत त्रुटी आहे की षड्यंत्र?
त्याचवेळी राज्यसभा खासदार आणि भाजपचे प्रवक्ते डॉ. सुधांशू त्रिवेदी म्हणाले की, आज अशी घटना घडली आहे, जी भारताच्या इतिहासात कधीही घडली नाही. दहशतवादाच्या काळात आणि दहशतवादग्रस्त भागातही पंतप्रधानांच्या सुरक्षेबाबत त्रुटी आढळून आल्या नव्हत्या.
नेमके काय घडले?
आज पीएम मोदी पंजाबच्या भटिंडा येथे पोहोचले. येथून त्यांना हेलिकॉप्टरने हुसैनीवाला येथील राष्ट्रीय शहीद स्मारकावर जायचे होते. पण खराब प्रकाश आणि पावसामुळे पीएम मोदी 20 मिनिटे थांबले. पण हवामानात सुधारणा होत नसल्याने त्यांनी रस्त्याने राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जाण्याचा निर्णय घेतला. या मार्गाने २ तास लागणार होते. पंजाब डीजीपींकडून सुरक्षेबाबत ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतरच पंतप्रधान मोदींचा ताफा रस्ते मार्गाने निघाला होता.
आंदोलकांनी रोखला मार्ग
पंतप्रधान मोदींचा ताफा राष्ट्रीय हुतात्मा स्मारकापूर्वी सुमारे ३० किमी अंतरावर असलेल्या उड्डाणपुलावर पोहोचला तेव्हा काही आंदोलकांनी इथला रस्ता अडवला. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या ताफ्याला उड्डाणपुलावर १५ ते २० मिनिटे थांबावे लागले. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक मानली जात आहे.
जेपी नड्डांचाही हल्लाबोल
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्ढा यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, आगामी विधानसभा निवडणुकीत लोकांच्या हातून दारूण पराभवाच्या भीतीने पंजाबमधील काँग्रेस सरकारने पंतप्रधान मोदींचे पंजाबमधील कार्यक्रम उधळून लावण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. पंतप्रधानांच्या सुरक्षेशी गंभीर खेळ केला. देशाच्या पंतप्रधानांनी देशाचे महान सुपुत्र सरदार भगतसिंग आणि इतर हुतात्म्यांना आदरांजली वाहायची आणि मोठ्या विकास कामांची पायाभरणी करायची होती, याचीही जाण पंजाबच्या काँग्रेस सरकारने ठेवली नाही, असेही ते म्हणाले.
Congress bloody intentions Unsuccessful, Smriti Irani attacks Punjab Congress CM Channi Over flaws in PM Modi security
महत्त्वाच्या बातम्या
- पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी आधी फोनही घेतला नाही, आता स्पष्टीकरणादाखल म्हणाले- हेलिकॉप्टरने येणार होते, पण शेवटच्या क्षणी पीएम मोदी रस्तेमार्गाने आले!
- पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर त्रुटी : मुख्यमंत्री शिवराज म्हणाले – गांधी परिवारात एवढा द्वेष भरलाय? त्यांनी पंतप्रधानांच्याच नव्हे तर देशाच्या सुरक्षेशी खेळ केला!
- पंतप्रधानांच्या सुरक्षेशी गंभीर खेळ : विमानतळावर अधिकाऱ्यांना मोदी म्हणाले, पंजाब सीएमना धन्यवाद सांगा, की मी जिवंत परतलो!!
- The focus india exclusive : अतिउच्चपदस्थांच्या सुरक्षा व्यवस्थेच्या उल्लंघनाचा बंगाल आणि पंजाब पॅटर्न!!
- आनंदाची बातमी : कोरोना बरा करणारी गोळी आली, 5 दिवसांचा कोर्स; किंमत किती आणि कुठून कराल खरेदी? वाचा सविस्तर