वृत्तसंस्था
पुणे : राज्य घटना सर्वांना समान अधिकार देते. मात्र, काँग्रेस पक्षाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवंत असताना आणि मृत्यूनंतरही अपमान करण्याची एकही संधी सोडली नाही. त्यांचा नेहमीच अपमान केला, अशी जोरदार टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी केली. Congress always insulted BR Ambedkar, even after his death: Amit Shah
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पायाभरणीसाठी शहा यांनी पुणे महापालिकेला भेट दिली. यावेळी त्यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच संविधान दिन सुरू केला. त्याला पण काँग्रेसने नेहमीप्रमाणे विरोध केला. आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांचा दुस्वास काँग्रेस करत असल्याचे एक उदाहरण आहे. ते म्हणाले की आंबेडकरांना भाजपच्या राजवटीत भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार (मरणोत्तर) बहाल केला होता.
ते म्हणाले, “केंद्रात आणि विविध राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतरच आंबेडकर यांच्याशु संबंधित पाच ठिकाणांचे स्मृतीस्थळात रूपांतर करण्यात आले.” आंबेडकरांचा वारसा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल या भीतीपोटी काँग्रेस राजवटीत संविधान दिवस साजरा केला गेला नाही, असा आरोप शहा यांनी काँग्रेसवर केला.
नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर ‘संविधान दिवस’ साजरा करायला सुरुवात झाली. पण मोदीजी जेव्हा जेव्हा संविधान दिवस साजरा करतात तेव्हा कॉंग्रेस विरोध करते. आणि आता तोच कॉंग्रेस पक्ष बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतोय. मला एवढेच सांगायचे आहे की, भाजपला आणायचे आहे. काँग्रेसच्या विरोधाला न जुमानता स्वतंत्र भारतासाठी संविधान आणि सुशासनासाठी आंबेडकरजींचे योगदान मोलाचे आहे,” ते म्हणाले. संविधान दिन, ज्याला “राष्ट्रीय कायदा दिवस” म्हणून देखील ओळखले जाते, दरवर्षी २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान स्वीकारल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
शाह म्हणाले की, केंद्राला आंबेडकरांच्या कार्याची माहिती जनतेला द्यायची आहे. “पंतप्रधान राज्य घटनेनुसार राज्य चालवत आहेत.”
Congress always insulted BR Ambedkar, even after his death: Amit Shah
महत्त्वाच्या बातम्या
- राज्यांनी न्यायवैद्यक विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करावी ; अमित शाह यांचे आवाहन
- हे सत्तेच्या नादात इतके मशगुल आहेत की त्यांना गरीब कामगारांकडे पाहायला वेळ नाही ; प्रविण दरेकरांची महाविकास आघाडी सरकारवर टीका
- कोलकाता महापालिका निवडणुकीच्या मतदानावेळी बॉम्बस्फोट, सियालदह आणि टाकी बॉईज स्कूलमधील स्फोटात तीन जखमी