मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीमध्ये अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली. इनक्युबेशन सेंटरचा संदर्भ घेत त्यांनी आम्हीसुद्धा 25 वर्षे नको ती अंडी उबवल्याचं म्हणत शिवसेना भाजपच्या 25 वर्षांच्या युतीवर भाष्य केलं.CM Uddhav Thackeray Criticizes BJP in Baramati in Incubation and Innovation Center inauguration Function
प्रतिनिधी
बारामती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बारामतीमध्ये अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राज्यातील प्रमुख उद्योजकांची उपस्थिती होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी भाजपवर चौफेर टीका केली. इनक्युबेशन सेंटरचा संदर्भ घेत त्यांनी आम्हीसुद्धा 25 वर्षे नको ती अंडी उबवल्याचं म्हणत शिवसेना भाजपच्या 25 वर्षांच्या युतीवर भाष्य केलं.
मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, मला यायला अडचण होती. पण ती अडचणही सांगून टाकतो. दोन चार दिवसांपासून माझे पाय धरले. कोणी पाय धरावे एवढा मोठा मी झालो नाही. आपले आपलेच धरले. त्यामुळे चालायला आणि उभं राहायला त्रास झाला. पण मी कधीच डगमगत नाही.
इनक्युबेशन सेंटरचा धागा पकडत ते म्हणाले की, राजकारणात उबवणी केंद्र असायला पाहिजे. आम्हीही 25 वर्षे उबवणी केंद्रे निर्माण केली होती. आम्ही नको ती अंडी उबवली. आता त्याचं काय झालं ते तुम्ही पाहातच आहातच, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
शरद पवारांनी दाखवला विकासाचा सूर्य
मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले की, शरद पवारांसारखा तरणाबांड नेता आपल्यासोबत आहे. सुप्रिया तू खरं सांगितलं की खोटं… सहस्रचंद्रदर्शन… ज्याने विकासाचा सूर्य दाखवला… अजूनही थांबत नाही. पवारसाहेब नेतृत्व करत आहेत. महाराष्ट्राचं आणि या संस्थांचं. सर्व कुटुंबच तळमळीने काम करत आहे. कुटुंब रंगलं काव्यात तसं पवार कुटुंब एका ध्यासात रमलं आहे, अशी स्तुतीही त्यांनी केली. राजकारणात टीकाकार असतात असलेच पाहिजे.
आम्हीही इतके दिवस तुमचे टीकाकार आहोत. शिवसेना प्रमुख म्हणायचे, अरे शरदबाबू बारामतीत काय करतात ते जरा बघितलं पाहिजे. हे असे संबंध होते. राजकारणात पटत नाही म्हणून एखाद्याच्या कामात विघ्न आणणं योग्य नाही. पाठिंबा देता येत नाही तर किमान विघ्न आणू नये. पण काय करावं आपल्याकडे अनेक विघ्नसंतोषी लोकं आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.
CM Uddhav Thackeray Criticizes BJP in Baramati in Incubation and Innovation Center inauguration Function
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान