वृत्तसंस्था
रायपूर : प्रधानमंत्री आवास योजनेवरुन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्राने या योजनेचा २०२१-२०२२ साठीचा राज्याचा प्रलंबित निधी वितरित केला नाही, त्याऐवजी योजनेचे लक्ष्य पूर्ण न केल्याबद्दल छत्तीसगड सरकारलाच लक्ष्य केले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. CM Bhupesh Baghel erupts on central govt
या योजनेत छत्तीसगडची कामगिरी खराब असल्याचे सांगत केंद्राने योजनेचा राज्याचा निधी परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. बघेल म्हणाले, या योजनेला पंतप्रधानांचे नाव दिले आहे तर केंद्र व राज्यात निधीचे वाटप अनुक्रमे ६०:४० या प्रमाणात का, योजनेचा पूर्ण निधी केंद्र सरकारने द्यायला हवा. निधी उपलब्ध होताच गरीबांसाठी पुन्हा घरे बांधण्यास सुरूवात करू.
केंद्राने उत्पादन शुल्कातील तसेच जीएसटीतील वाटा राज्याला न देण्याचा मुद्दा आम्ही सातत्याने उपस्थित करत आहोत. ही प्रलंबित रक्कम जवळपास २२ हजार कोटी आहे. छत्तीसगडमध्ये कोळसा खाणीची परवानगी दिलेल्या खाणमालकांकडून वसून केलेला ४,१४० कोटींचा दंडही केंद्राने राज्य सरकारला अद्याप दिलेला नाही, असेही त्यांनी नमूद केले.
CM Bhupesh Baghel erupts on central govt
महत्त्वाच्या बातम्या
- ओमायक्रोनच्या विषाची परीक्षा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ दक्षिण आफ्रिकेला पाठविण्याचा चंग
- ४१ वर्षीय शेतकऱ्याचे मरणाेपरांत अंगदान ; चिमुकलीसह चार जणांना नवजीवन मिळणार
- एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई सुरूच ; अनिल परब यांनी दिली महत्वाची माहिती
- गोरगरीबांसाठीच्या उज्वला योजनेतही माध्यमाकडून राजकारण, मोदी सरकारने २०१९ पूर्वीच बहुतांश गरजुंपर्यंत पोहोचण्याचा केला प्रयत्न
- पोलीसच बनले वऱ्हाडी, पळून गेलेल्या युवक-युवतीचा पोलीस ठाण्यातच लावला विवाह