वृत्तसंस्था
नवी दिल्ली : इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात युद्ध सुरू होण्याच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर भारताने लेबनॉनमधील आपल्या नागरिकांसाठी ॲडव्हायझरी जारी केली आहे. राजधानी बैरूतमधील भारतीय दूतावासाने लेबनॉनमध्ये राहणाऱ्या आणि तेथे जाण्याची योजना आखणाऱ्या भारतीयांना सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे.Clouds of war gather in Lebanon, advisory issued by India; Citizens urged to be cautious
तसेच, दूतावासाने कोणत्याही प्रकारच्या मदतीसाठी आपत्कालीन फोन नंबर दिला आहे. +96176860128 आणि ईमेल आयडी cons.beirut@mea.gov.in देखील जारी केला आहे.
खरं तर, शनिवारी इस्रायल-व्याप्त गोलान हाइट्सवर इराण समर्थित मिलिशिया हिजबुल्लाहने हल्ला केला होता. या हल्ल्यात 12 इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता. यानंतर, इस्रायली सैन्याने दक्षिण आणि पूर्व लेबनॉनमधील गावे आणि शहरांवर बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायल हिजबुल्लावर मोठ्या प्रमाणावर हल्ला करण्याची तयारी करत आहे. पुढील कारवाई करण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी तेल अवीवमध्ये सुरक्षा मंत्रिमंडळाची बैठक बोलावली आहे. इराणनेही याबाबत इस्रायलला उघडपणे युद्धाची धमकी दिली आहे.
शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनॉनवर ड्रोन हल्ले सुरू केले आहेत. दक्षिण लेबनॉनमध्ये रविवारी रात्री उशिरा झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन जण ठार, तर तीन जखमी झाले. इस्रायलच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर लेबनॉनमधील हवाई सेवा बंद करण्यात आली आहे.
लेबनॉनच्या मिडल ईस्ट एअरलाइन्सने सांगितले की शंभरहून अधिक उड्डाणे रद्द किंवा लेट झाली आहेत. लुफ्थांसा एअरलाइन्सने 30 जुलैपर्यंत 5 मार्गांवरील उड्डाणे रद्द केल्याचे सांगितले.
बैरूत रफिक हरिरी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे लेबनॉनमधील एकमेव विमानतळ आहे. इस्रायलसोबतच्या युद्धात आणि पुन्हा गृहयुद्धाच्या काळात या विमानतळाला लक्ष्य करण्यात आले आहे.
नॉर्वेने म्हटले- संघर्ष वाढेल, नागरिकांनी लवकरात लवकर लेबनॉन सोडावे
बैरूतमधील नॉर्वेजियन दूतावासाने लेबनॉन-इस्रायल संघर्ष वाढल्याचा इशारा दिला आहे. दूतावासाने नागरिकांना देश सोडण्यास सांगितले आहे. परिस्थिती बिघडल्यास लेबनॉनच्या बाहेर प्रवासाचे पर्याय मर्यादित असू शकतात.
Clouds of war gather in Lebanon, advisory issued by India; Citizens urged to be cautious
महत्वाच्या बातम्या
- यूपी सरकारने लव्ह जिहादवर जन्मठेपेचे विधेयक आणले; धर्मांतर रोखण्यासाठी घेतला निर्णय, तुरुंगवास आणि दंडात वाढ
- राज्यसभेत ‘जया अमिताभ बच्चन’ म्हटल्यावर जया बच्चन संतापल्या!
- भारतात व्हॉट्सॲप बंद होणार का? आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले ‘हे’ उत्तर
- आज पुन्हा राहुल गांधी आणि काँग्रेसची अपरिपक्वता जनतेसमोर उघड झाली ‘