• Download App
    Chirag Paswan बॉम्बस्फोट करून माझा खून करण्याचा कट, चिराग पासवान यांचा गंभीर आरोप

    Chirag Paswan बॉम्बस्फोट करून माझा खून करण्याचा कट, चिराग पासवान यांचा गंभीर आरोप

    विशेष प्रतिनिधी

    मुंगेर (बिहार) : केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे अध्यक्ष चिराग पासवान यांनी खळबळजनक दावा करत विरोधकांवर थेट हल्ला चढवला आहे. बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात आयोजित सभेत बोलताना त्यांनी म्हटले की, “माझा जीव घेण्यासाठी विरोधकांनी मला बॉम्बने उडवण्याचा कट रचला आहे.” Chirag Paswan

    चिराग म्हणाले, “माझ्यावर मानसिकदृष्ट्या खचविण्याचे अनेक प्रयत्न झाले. पण आता माझा जीव घेण्याचा कट आखण्यात आला आहे. मला धमक्या देणाऱ्यांनी पोलिसांत तक्रार झाल्यानंतरही माघार घेतलेली नाही. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी मी वाघाचा पिल्ला आहे. मी कोणासमोरही झुकत नाही आणि कोणत्याही धमकीला घाबरत नाही.” Chirag Paswan



    चिराग पासवान यांनी यावेळी त्यांच्या काका आणि एलजेपीमधील फुटलेल्या गटाचे नेते पशुपती कुमार पारस यांच्यावरही टीका केली. पारस गटाच्या आरजेडीशी जवळीक वाढवत असल्याच्या पार्श्वभूमीवर चिराग यांनी अप्रत्यक्षपणे आरजेडीवरही निशाणा साधला. बिहार फर्स्ट, बिहारी फर्स्ट’ हा माझा नारा अनेकांना अस्वस्थ करत आहे. कारण तो त्यांच्या पारंपरिक जातीय समीकरणांना धक्का देतो. जे लोक कधीच बिहारच्या विकासात स्वारस्य घेत नव्हते, त्यांनी राज्याला मागे टाकले, आज तेच लोक नवी खोटी आश्वासने देऊन मत मागत आहेत,” असे चिराग म्हणाले.

    चिराग पासवान यांना काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे या बॉम्ब हल्ल्याच्या कटाचा आरोपही त्याच संदर्भात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)च्या नेत्यांनी चिराग यांच्या आरोपांना गांभीर्याने घेतले असून, “हे धमकीप्रकरण केवळ राजकीय दबावाचे नाही तर त्यांच्या लोकप्रियतेच्या भीतीने आखलेले षड्यंत्र आहे,” असे पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. “चिरागजी म्हणजे शेर का बेटा आहे. त्याला घाबरवणं अशक्य आहे,” असेही ते म्हणाले.

    Chirag Paswan’s serious allegation: Conspiracy to kill me by exploding a bomb

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार

    India Wins : भारताने सहाव्यांदा अंडर-19 वर्ल्डकप जिंकला; इंग्लंडचा 100 धावांनी पराभव, वैभव सूर्यवंशीच्या 175 धावा