• Download App
    Chief Justice of Bangladesh resigned शेख हसीना यांच्यानंतर बांगलादेशच्या

    Sheikh Hasina : शेख हसीना यांच्यानंतर बांगलादेशच्या सरन्यायाधीशांनी आंदोलकांसमोर हात टेकले!

    Chief Justice of Bangladesh resigned

    आज संध्याकाळी राजीनामा देणार आहेत


    विशेष प्रतिनिधी

    ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांनी राजीनामा दिल्यानंतर आता सरन्यायाधीशांनी आंदोलकांसमोर हात टेकले आहेत. शनिवारी हजारो आंदोलकांनी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाला घेराव घातला आणि सरन्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी सुरू केली. आंदोलकांनी सरन्यायाधीशांना दुपारी 1 वाजेपर्यंत पदाचा राजीनामा देण्याचा अल्टिमेटम दिला होता. ओबेदुल हसन यांची गेल्या वर्षी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. ज्यांना माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे जवळचे आणि एकनिष्ठ मानले जाते.

    सुप्रीम कोर्टात झालेल्या निदर्शनानंतर बांगलादेशचे सरन्यायाधीश ओबेदुल हसन यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. वृत्तानुसार, शेकडो निदर्शकांनी राजधानी ढाक्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या संकुलाला घेराव घातला आणि मुख्य न्यायाधीश आणि अपील विभागाच्या इतर न्यायाधीशांना दुपारी 1 वाजेपर्यंत (स्थानिक वेळ) पायउतार होण्याचा अल्टिमेटम दिला होता.



    स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरन्यायाधीश ओबेदुल हसन शनिवारी संध्याकाळी अध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर राजीनामा देतील. बांगलादेशच्या सरन्यायाधीशांनी शनिवारी दुपारी राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आंदोलक न्यायालयाच्या आवारात जमा झाले.

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरन्यायाधीशांनी मुदतीपूर्वी राजीनामा न दिल्यास आंदोलकांनी न्यायाधीशांच्या निवासस्थानांना घेराव घालण्याची धमकी दिली होती. शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विद्यार्थी आणि वकिलांसह शेकडो आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आवारात सरन्यायाधीश आणि अपीलीय विभागाच्या न्यायाधीशांच्या राजीनाम्याची मागणी करत निदर्शने केली.

    Chief Justice of Bangladesh resigned

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार