वृत्तसंस्था
बंगळुरू : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि देशातील जनतेसाठी एक वाईट बातमी आहे. इस्रोचे महिला शास्त्रज्ञाचे दु:खद निधन झाले आहे. भारताच्या मून मिशन म्हणजेच चांद्रयान-3 साठी काउंटडाऊन करणारा आवाज कायमचा शांत झाला. शास्त्रज्ञ वालारमथी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.Chandrayaan-3 farewell sound goes quiet, ISRO scientist dies of heart attack
इस्रोच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला शोक
काही सेलिब्रिटी, राजकारणी, क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींचे आवाज आयुष्यभर आपल्या मनात घर करून राहतात. असाच एक आवाज आता कायमचा आपल्यातून निघून गेला आहे. चांद्रयान-३ मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळी आपल्या अनोख्या आवाजाने घोषणा करणाऱ्या वालारमथी यांनी रविवारी संध्याकाळी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे इस्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये शोककळा पसरली आहे.
तामिळनाडूतील अरियालूर येथील वलरमथी यांचा रविवारी संध्याकाळी मृत्यू झाला. राजधानी चेन्नईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या वर्षी 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या उत्तर ध्रुवावर उतरलेले चांद्रयान 3 आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून 14 जुलै रोजी प्रक्षेपित करण्यात आले. प्रक्षेपण काउंटडाउनला वालारमथी यांनी आवाज दिला होता.
सोशल मीडियावर दुःख व्यक्त
इस्रोचे माजी शास्त्रज्ञ डॉ. पी. व्ही. वेंकटकृष्ण यांनी वालारमथी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. श्रीहरिकोटा येथून इस्रोच्या भविष्यातील मोहिमांच्या काउंटडाऊनमध्ये यापुढे वालारमथीचा आवाज ऐकू येणार नाही, असे ते म्हणाले. चांद्रयान-३ हे त्यांचे शेवटचे काउंटडाउन होते. वालारमथी यांच्या निधनाच्या वृत्ताने अतिशय दु:ख झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर सोशल मीडियावरही लोक आपली व्यथा मांडत आहेत.
चांद्रयान-3 मोहिमेच्या टीममध्ये वालारमथी यांचा समावेश
चांद्रयान-3 चे विक्रम लँडर 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले आणि भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. चंद्रावर मोहीम यशस्वी करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. यासह, दक्षिण ध्रुवावर उतरणारा हा जगातील एकमेव देश ठरला. शनिवारी इस्रोने 11व्या दिवशी प्रज्ञान रोव्हर स्लीप मोडमध्ये टाकले. आता प्रज्ञान 14 दिवसांनी पुन्हा आपले काम सुरू करणार आहे.
Chandrayaan-3 farewell sound goes quiet, ISRO scientist dies of heart attack
महत्वाच्या बातम्या
- भारताची संरक्षण निर्यात 6 वर्षांत 10 पटींनी वाढली, 80 देशांना 16 हजार कोटींची शस्त्र विक्री
- PM मोदी म्हणाले- देशात पूर्वी एक अब्ज उपाशी होते, आता दोन अब्ज कुशल हात; 2047 पर्यंत भारत विकसित देश होणार
- मध्यावधी नाहीच, निवडणूकही लांबणीवर टाकणार नाही; केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी फेटाळले विरोधकांचे दावे
- Maratha Reservation :”…म्हणजे याचाच अर्थ मराठा आरक्षणाला शरद पवार यांचा पाठिंबा नाही” भाजपाने साधला निशाणा!