कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची घोषणा करण्याची तयारी केली आहे. काँग्रेसमधील बेबनावानंतर कॅप्टन मोठी उलथापालथ घडवण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी रात्री त्यांनी पुन्हा एक पोस्टर रिलीज करून शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आधी काळा कायदा (कृषी सुधारणा कायदा) मागे घ्यावा, त्यानंतरच भाजपशी कोणताही राजकीय संवाद होईल.captain amarinder Preparation For New Party, asks BJP to Revoke Farm Bills For any Political Discussion
वृत्तसंस्था
चंदिगड : कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्षाची घोषणा करण्याची तयारी केली आहे. काँग्रेसमधील बेबनावानंतर कॅप्टन मोठी उलथापालथ घडवण्याच्या तयारीत आहेत. शनिवारी रात्री त्यांनी पुन्हा एक पोस्टर रिलीज करून शेतकरी आंदोलनावर भाष्य केले. ते म्हणाले की, केंद्र सरकारने आधी काळा कायदा (कृषी सुधारणा कायदा) मागे घ्यावा, त्यानंतरच भाजपशी कोणताही राजकीय संवाद होईल. आता कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रावर दबाव आणण्यास सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले असून त्याचा परिणाम लवकरच दिसून येईल. दिवाळीच्या जवळजवळ कॅप्टन नव्या पक्षाची घोषणा करू शकतात, अशीही चर्चा आहे.
पंजाबमध्ये मोठी राजकीय उलथापालथ
कॅप्टन अमरिंदर यांच्या गटाची रणनीती यापुढे कॉंग्रेसला जबरदस्त हादरा देण्याची आहे. सुरुवातीला कॅप्टनच्या जवळचे काही माजी मंत्री आणि आमदार त्यांच्यासोबत असतील. यानंतर हळूहळू आमदार आणि दिग्गज काँग्रेसजनांचा समावेश केला जाईल. निवडणुकीपर्यंत काँग्रेसला सावरण्याची संधी मिळू नये, अशी त्यांची योजना आहे. सूत्रांनुसार, कॅप्टन जवळपास 15 आमदारांच्या संपर्कात आहेत. निवडणूक आणि तिकीट वाटपापर्यंत काँग्रेसला बंडखोरीत अडकवून ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
भाजपपुढे पेच, कॅप्टनचे कृषी कायदे हटवण्याचे आवाहन
पंजाबच्या राजकारणात भाजप कधीच आघाडीचा पक्ष राहिला नाही. आतापर्यंत अकाली दलाच्या मदतीने राज्याच्या राजकारणात होता. आता पंजाबमध्ये भाजपचा कोणताही मोठा शीख चेहरा नाही, ज्याचा संपूर्ण पंजाबमध्ये आधार आहे. अकाली दलाशी युती तोडल्यानंतर भाजपसाठी कॅप्टनसारखा चेहरा आवश्यक आहे. यापूर्वी प्रकाश सिंह बादल यांच्या रूपात एक अनुभवी शीख चेहरा होता. आता भाजप कॅप्टनशी हातमिळवणी करून त्याची भरपाई करू शकते. कॅप्टन अमरिंदर यापूर्वी असेही म्हणाले आहेत की, भाजप मुस्लिमविरोधी किंवा जातीयवादी पक्ष नाही. यामुळे आता पुढील काही दिवसांत होणाऱ्या घडामोडी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत.
captain amarinder Preparation For New Party, asks BJP to Revoke Farm Bills For any Political Discussion
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
- पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
- महागाईचा परिणाम : 14 वर्षांनंतर वाढणारे आगपेटीचे दर, एका झटक्यात दुप्पट होणार किंमत