• Download App
    तीन राज्ये जिंकून, भाजपची आता देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर सत्ता! By winning three states the BJP now rules more than half of the country population

    तीन राज्ये जिंकून, भाजपची आता देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर सत्ता!

    काँग्रेसची सत्ता अवघ्या 8.5 टक्के भारतीयांपर्यंत मर्यादित

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आणि यामध्ये भाजपाने तीन राज्यांमध्ये विजय मिळवला. यात भाजपला दोन नवीन राज्यांमध्ये सरकार स्थापन करण्याचा अधिकार तर मिळालाच पण आता देशाच्या 41 टक्क्यांहून अधिक लोकसंख्येवरही भाजप स्वबळावर नियंत्रण ठेवत आहेत. तसेच विविध आघाडीच्या भागीदारांच्या दृष्टीकोनातून पैलूकडे पाहिल्यास, भाजप आता देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर राज्य करत आहे. By winning three states the BJP now rules more than half of the country population

    याउलट, देशातील सर्वात जुना आणि तथाकथित ‘प्रमुख’ विरोधी पक्ष, काँग्रेसने देशाच्या केवळ 8.51 टक्के लोकसंख्येवर स्वबळावर राज्य करत आहे आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या भागीदारीच्या मदतीने कॉंग्रेस 19.84 टक्के भारतीयांवर राज्य आहे.

    रविवारी निवडणूक निकालानंतर भाजपचे आता देशातील उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आसाम, छत्तीसगड, हरियाणा, उत्तराखंड, त्रिपुरा, मणिपूर, गोवा आणि अरुणाचल प्रदेश या 12 राज्यांमध्ये स्वतःचे सरकार आहे.

    या 12 राज्यांव्यतिरिक्त, भारतीय जनता पक्ष, म्हणजेच भाजप, महाराष्ट्र, मेघालय, नागालँड आणि सिक्कीम या राज्यांमध्ये युती करून राज्य करत आहे. त्यामुळे भाजपचे आता देशाच्या निम्म्याहून अधिक लोकसंख्येवर राज्य आहे.

    By winning three states the BJP now rules more than half of the country population

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार