वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरातल्या रस्ते वाहतुकीत नेमका कोणता महत्त्वपूर्ण बदल होणार आहे यावर केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठे भाष्य केले आहे. या दशकाच्या अखेरीस भारतीय रस्त्यांवर 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील, अशी माहिती त्यांनी दिली आहे. By 2030, India will run 2 crore electric vehicles on the road.
इलेक्ट्रिक मोबिलिटी आणि भविष्यातील गतिशीलता या विषयावरील एका कार्यक्रमात बोलताना गडकरी म्हणाले की, ई – मोबिलीटीमध्ये मोठी क्षमता आहे आणि गुंतवणूकदारांनी पर्यावरण वाचण्यासाठी या क्षेत्रात येऊन गुंतवणूक केली पाहिजे. 2030 पर्यंत भारतात सुमारे 2 कोटी इलेक्ट्रिक वाहने धावतील. तसे नियोजन केंद्र सरकारने केले आहे, असेही गडकरी म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांमुळे केवळ प्रदूषण कमी होण्यास मदत होणार नाही तर रोजगार निर्मितीलाही मदत होईल, ज्याचा परिणाम देशाच्या विकासावर होईल आणि भारत स्वावलंबी होण्यास मदत होईल, या मुद्द्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
By 2030, India will run 2 crore electric vehicles on the road.
महत्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा धक्कादायक दावा : तुरुंगातच मिळाली होती ऑफर, ऐकली असती तर खूप आधीच कोसळले असते मविआ सरकार
- पंतप्रधान मोदी आज बंगळुरूत करणार एअरो इंडिया शोचे उद्घाटन : सुपरसॉनिक विमानांचे दिसेल थरारक उड्डाण
- दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेचे उद्घाटन : मोदी म्हणाले- सीमेवर रस्ता बांधायला घाबरायची काँग्रेस, त्यांना सैनिकांच्या शौर्यावर संशय होता
- बिग बॉस 16चा किताब पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनला : शिव ठाकरे रनरअप, सलमानसाठी प्रियांका चौधरी राहिली खरी विनर