सात तस्करांना बीएसएफच्या जवानांनी केली अटक
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत-बांगलादेश सीमेवर बीएसएफला मोठे यश मिळाले आहे. बीएसएफ आणि डीआरआयच्या यशस्वी संयुक्त ऑपरेशनमध्ये, सुरक्षा दलांनी 11.5 लाख रुपये रोख आणि 6.86 कोटी रुपयांचे 9.6 किलो सोने तस्करी करणाऱ्या सात जणांना पकडले आहे. या घटनेत सहभागी असलेल्या सर्व तस्करांना सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून अटक केली आहे.BSF seized more than 9 kg of gold along with lakhs of rupees on the Indo-Bangladesh border
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण बंगाल फ्रंटियर अंतर्गत नादिया जिल्ह्यात तैनात असलेल्या 68 बटालियनच्या बीएसएफ जवानांनी महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) सोबत संयुक्त कारवाई केली. या कारवाईदरम्यान सीमानगर येथून सुरक्षा दलांनी सात तस्करांना अटक केली.
तसेच, सुरक्षा दलांनी त्यांच्या ताब्यातून 16 सोन्याच्या विटा आणि 9.572 किलो वजनाचे एक सोन्याचे बिस्किट आणि 11,58,500 रुपयांची रोकड जप्त केली आणि सोन्याच्या वितरणासाठी वापरलेली मारुती इको कार देखील जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या सोन्याची एकूण अंदाजे किंमत 6,86,23,582 रुपये आहे.
माहितीनुसार, ही घटना 4 जुलै 2024 रोजी घडली ज्यामध्ये डीआरआयने सोन्याच्या तस्करीची माहिती बीएसएफच्या गुप्तचर विभागाशी शेअर केली. माहिती मिळाल्यावर, बीएसएफच्या 68 बटालियन आणि डीआरआयच्या संयुक्त पथकाने सीमानगर भागात राज्य महामार्ग क्रमांक 11 वर वाहनांची मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवली.
दरम्यान, पहाटे 05.30 ते 9 वाजेदरम्यान चाललेल्या या कारवाईत जवानांनी एका संशयास्पद मारुती इको कारमधून 4.8 किलो सोन्यासह दोन तस्करांना अटक केली. यानंतर झडतीदरम्यान 4.82 किलो सोन्यासह अन्य 4 तस्करांनाही ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका कारवाईत, करीमपूरच्या रामनगर गावात एका संशयास्पद घराची झडती घेताना, 1 सोन्याचे बिस्किट आणि 11,58,500 रुपये किमतीच्या अवैध रोख रकमेसह एका व्यक्तीला अटक करण्यात आली.
BSF seized more than 9 kg of gold along with lakhs of rupees on the Indo-Bangladesh border
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन झारखंडचे 13 वे मुख्यमंत्री बनले; ज्या राजभवनात अटक केली, तिथेच 156 दिवसांनी घेतली शपथ
- टीम इंडियाला मिळाला असा सन्मान जो आजपर्यंत ना कोणत्या पंतप्रधानांना मिळा ना मुख्यमंत्र्यांना!
- हेमंत सोरेन यांनी तिसऱ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ!
- अदानीचे शेअर्स विकत घेऊन जगणाऱ्या काँग्रेसने आम्हाला अदानी बद्दल विचारू नये’