• Download App
    जवानांसोबत थिरकला बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार|Bollywood actor Akshay Kumar with the jawans

    जवानांसोबत थिरकला बॉलीवुडचा खिलाडी अक्षय कुमार

    काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने जवानांसोबत दिवस घालविला. त्यांच्यासोबत त्याने डान्सही केला.Bollywood actor Akshay Kumar with the jawans


    विशेष प्रतिनिधी

    श्रीनगर : काश्मीरमधल्या बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेझ व्हॅलीमध्ये नियंत्रण रेषेजवळील एका गावात बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याने जवानांसोबत दिवस घालविला. त्यांच्यासोबत त्याने डान्सही केला.
    अक्षय दुपारी बाराच्या सुमारास गुरेझ व्हॅलीमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचला. या वेळी जम्मू-काश्मीर पोलिसांसोबत सैनिक आणि सैन्य अधिकारीही उपस्थित होते.

    अक्षयने त्यांच्यासोबत डान्सही केला. त्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून समोर आले आहेत. काही फोटो स्वत: अक्षयने शेअर केले आहेत.अक्षयने हे फोटो त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करताना म्हटले आहे की, बीएसएफ सोबत एक अविस्मरणीय दिवस घालवला.



    बीएसएफचे सैनिक आज सीमेचे रक्षण करत आहेत. इथे आल्यावर मी नेहमीच विनम्र होतो. या हीरोंना भेटल्यावर माझ्या हृदयात फक्त एक आदर असतो. अक्षयचे हे ट्वीट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे.

    अक्षय भारतीय सैन्य आणि सैनिकांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे येतो. २०१७ मध्ये त्याने सैनिकांसाठी भारत के वीर नावाचा एक उपक्रमसुद्धा सुरू केला. या माध्यमातून देश आणि लोकांच्या सुरक्षेचे कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या सैनिक आणि केंद्रीय सशस्त्र पोलिस दलाच्या कुटूंबियांची मदत केली जाते.

    सैनिक, बेबी, हॉलिडे या चित्रपटांमध्ये अक्षय कुमारने लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. आता लवकरच अक्षयचे बेल बॉटम आणि सुर्यवंशी हे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

    Bollywood actor Akshay Kumar with the jawans

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे