• Download App
    INDI आघाडीच्या नुसत्याच बैठका सुरू, जागावाटपाचा पत्ताच नाही; जुने मित्र नव्याने जोडण्यावर भाजपचा जोर!! BJP's emphasis on making new friends

    INDI आघाडीच्या नुसत्याच बैठका सुरू, जागावाटपाचा पत्ताच नाही; जुने मित्र नव्याने जोडण्यावर भाजपचा जोर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : INDI आघाडीत नुसत्याच बैठका सुरू, जागावाटपाचा पत्ताच नाही, पण दुसरीकडे जुनेच मित्र नव्याने जोडण्यावर भाजपने जोर दिला आहे. राहुल गांधी भारत जोडून न्याय यात्रेत मग्न आहेत. काँग्रेसच्या यादीचा पत्ता नाही. INDI आघाडीतले नेते रोज कुठे ना कुठेतरी बैठका घेत आहेत, पण त्यांचेही जागावाटपावर एकमत होत नाही. BJP’s emphasis on making new friends

    या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडी मात्र आपले जुने मित्र नव्याने जोडण्यावर भर देत आहे. ओडिशा मध्ये बिजू जनता दल – भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे, तर आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू भाजपच्या परत प्रेमात पडून तेलगू देशम पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश मिळवत आहेत. त्यांच्याच बरोबर अभिनेते पवन कल्याण हे देखील राष्ट्रीय लोकशाहीत आघाडीत यायला उत्सुक आहेत. त्यांनी या दोन्ही नेत्यांनी काल रात्री उशिरा केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची दिल्लीतल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. चंद्राबाबू नायडू आणि पवन कल्याण हे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आले तर दक्षिणेतील राज्य आंध्र प्रदेशात भाजपचा राजकीय बॅकलॉग भरून निघण्याची शक्यता आहे.

    भाजपने आधीच तब्बल 195 उमेदवारांची यादी जाहीर करून लोकसभा निवडणुकीत आघाडी घेतली आहे. त्या तुलनेत INDI आघाडीच्या फक्त बैठका सुरू आहेत. अजून जागावाटपाचा पत्ताच लागलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात चर्चा जास्त आणि काम कमी, अशी स्थिती आहे. उलट प्रकाश आंबेडकर आघाडीतल्या बैठकांमधली “सिक्रेट्स” जाहीरपणे सांगायला लागले आहेत. पण यातून प्रत्यक्षात दोन्ही आघाड्यांचा मिलाफ होण्याची शक्यता दुरावत चालली आहे.

    या पार्श्वभूमीवर भाजप प्रणित सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मात्र जुने मित्र पक्ष नव्याने पुन्हा आघाडीत सामील होत आहेत, यातून देशातल्या राजकीय पक्षांचा झुकाव कुठल्या बाजूने आहे, हे स्पष्ट दिसत आहे.

    BJP’s emphasis on making new friends

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

     Indian Citizenship : दरवर्षी 2 लाख लोक परदेशात स्थायिक होत आहेत; 5 वर्षांत 9 लाख भारतीयांनी नागरिकत्व सोडले

    Shivraj Singh Chouhan : शिवराज यांच्यावर पाक गुप्तचर संस्था ISI कडून हल्ल्याचे इनपुट; गृह मंत्रालयाचे सुरक्षा वाढवण्याचे आदेश

    मोदींच्या भाजपचा नवा धक्का; ब्रेकिंग न्यूज आणि शोध पत्रकारितेचा पापड मोडला!!, भाजपमध्ये मोठ्या बदलाची चुणूक