नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने मायावती आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे जातीय राजकारण करीत असल्याची टीका केली आहे.मायावती यांनी सत्ता हाती आल्यास उत्तर प्रदेशमध्ये ब्राह्मणांच्या सुरक्षेची काळजी घेण्याबद्दल भाष्य केले होते. त्यावर भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी टीका केली आहे.BJP targets Mayawati, Owesi
ते म्हणाले, ‘‘उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री पाच कोटींचा हार बाजूला ठेवत बाहेर आल्या आहेत, हे लोकशाहीसाठी चांगले आहे. परंतु याच बसपने पूर्वी ‘तिलक, तराजू और तलवार, इनको मारो जूते चार’ अशी घोषणा दिली होती. जे लोक जनतेसाठी काहीच काम करीत नाही.
त्यांना निवडणुकीत अशाप्रकारे जातीयवादी राजकारणाचा आधार घ्यावा लागतो.’’भाटियांनी ओवैसी यांच्यावरही टीका केली. ओवैसी जिथे जातील, तिथे ते राजकीय विष पेरतील. परंतु उत्तर प्रदेशची जनता सुज्ञ आहे. ते विकासालाच मतदान करतील.
BJP targets Mayawati, Owesi
महत्त्वाच्या बातम्या
- आकाशावर लक्ष ठेवण्यासाठी हवाई दलाला मिळणार सहा विमाने, अकरा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर
- भाषिक कट्टरता धोकादायक, हिंदी अधिकृत भाषा नसणाऱ्या राज्यांशी केंद्राने साधावा इंग्रजीमध्ये संवाद, मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश
- लस न घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर पंजाब सरकारचा बडगा, 15 सप्टेंबरनंतर सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश
- वर्क फ्रॉम होम नको रे बाप्पा..! तातडीने वर्क फ्रॉम ऑफिस सुरु न केल्यास लग्न टिकणारच नसल्याने कर्मचार्याच्या पत्नीचे उद्योगपतीला साकडे