• Download App
    'अखेर आज केजरीवलांच्या अहंकाराचा चुराडा झाला ', भाजपने अटकेवरून लगावला टोला! BJP spokesperson Sambit Patra criticized Chief Minister Kejriwal

    ‘अखेर आज केजरीवलांच्या अहंकाराचा चुराडा झाला ‘, भाजपने अटकेवरून लगावला टोला!

    भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी साधला आहे निशाणा, जाणून घ्या आणखी काय म्हणाले BJP spokesperson Sambit Patra criticized Chief Minister Kejriwal

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवरून भाजप सातत्याने निशाणा साधत आहे. ते म्हणतात की, अटकेपूर्वी केजरीवाल म्हणायचे की, मुख्यमंत्र्यांना समन्स कसं बजावलं जाऊ शकतं. पण आज त्यांचा अहंकार चकनाचूर झाला.

    भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी शुक्रवारी सांगितले की, ‘२३ ऑक्टोबरपर्यंत नऊ समन्स जारी करण्यात आले होते, मात्र ते एकदाही हजर झाले नाहीत. समन्स बेकायदेशीर असून हजर होणार नाही, असे तो सांगत होते. ते मुख्यमंत्री असून त्यांना कसे बोलावता येईल, असेही ते म्हणायचे परंतु आज त्याचा अहंकारचा चुराडा झाला आहे.

    भाजप प्रवक्ते म्हणाले की, देशाचा कायदा सांगतो की, तुम्ही कायदा मोडला असेल आणि समन्स बजावले असेल, तर तुम्ही त्याचा आदर करून उपस्थित राहावे. मात्र चिंतेची बाब म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी एकाही समन्सला प्रतिसाद दिला नव्हता.

    BJP spokesperson Sambit Patra criticized Chief Minister Kejriwal

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Pay Commission : 1 जानेवारीपासून आठवा वेतन आयोग लागू होणार; कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत करण्याची मागणी

    अर्बन नक्षलवाद्यांच्या हातात मराठीचे फलक; पण JNU मधल्या मराठी अध्यासनाला विरोध!!

    Vice President Election : द फोकस एक्सप्लेनर : उपराष्ट्रपती निवडणुकीची जोरदार तयारी; उमेदवारांची जोरदार चर्चा, कशी होते निवडणूक?