जाणून घ्या, भाजपा प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काय म्हटले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात अनेकदा जोरदार वाद होत असतो. विरोधी पक्षावर अनेकदा हल्लाबोल करण्यासाठी ओळखले जाणारे भाजपाचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत, अनेक प्रश्न विचारले आहेत. तसेच, भाटिया यांनी केजरीवाल यांना अप्रामाणिक व्यक्तीही म्हटले आहे. BJP spokesperson Gaurav Bhatia criticizes Aam Aadmi Party chief Kejriwal
भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया म्हणाले की, यापूर्वी आम्ही आम आदमी पार्टीच्या प्रमुखांना केवळ अप्रामाणिक आणि बेजबाबदार म्हणत होतो, परंतु काल सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या काही टिप्पण्यांच्या आधारे ते लोकविरोधी आणि फसवणूक करणारेही आहेत, याचा अंदाज लावता येतो.
यानंतर, रिजनल रॅपिड ट्रान्सपोर्ट सिस्टम (RRTS) बद्दल बोलताना गौरव भाटिया म्हणाले की RRTS हा एक कॉरिडॉर आहे जो दिल्ली आणि मेरठ दरम्यान बनवला जात आहे, ज्याचे अंतर 82 किमी असेल. उत्तर प्रदेश आणि दिल्लीच्या लोकांना दिल्लीहून मेरठला पोहोचण्यासाठी फक्त 1 तास लागेल. 17 किलोमीटर लांबीच्या या कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते.
BJP spokesperson Gaurav Bhatia criticizes Aam Aadmi Party chief Kejriwal
महत्वाच्या बातम्या
- चीनमध्ये मशिदी बंद करण्याचा सपाटा, पण एकाही मुस्लिम देशाने निषेध करण्याची धमक नाही दाखविली!!
- विषारी दारुमुळे होणाऱ्या मृत्यूंवरून जीतन राम मांझींचा नितीश कुमारांवर हल्लाबोल, म्हणाले…
- रामभक्तांवर गोळ्या झाडणाऱ्या मुलायम सिंहांच्या स्मारकाचे वैदिक मंत्रोच्चारात भूमिपूजन!!
- सावरकरांची जन्मभूमी भगूरमध्ये जरांगे पाटलांचे जोरदार स्वागत; सावरकर पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन!!