विशेष प्रतिनिधी
मंदसौर: आमीर खान यांना पहिली पत्नी रीना दत्तापासून २ मुलं आहेत. दुसरी किरण राव मुलांसह कुठे भटकेल याची चिंता नाही. पण आजोबा आमीर तिसरीच्या शोधात आहेत. हा एका अभिनेत्याचा संदेश आहे .? असा सवाल मंदसोरचे भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांनी केला आहे.BJP MP Sudhir Gupta alleges that people like Aamir Khan are responsible for population growth
जागतिक लोकसंख्या दिनाच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील भाजपच्या योगी सरकारने नवे लोकसंख्या नियंत्रण धोरण आणले आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही लोकसंख्या नियंत्रण धोरणावर लवकरच निर्णय घेणार असल्याचे म्हटले अहे.
या पार्श्वभूमीवर गुप्ता म्हणाले, देशाची लोकसंख्या नियंत्रणाबाहेर जाण्यास आमीर खानसारख्या लोकांचा हात आहे. हे देशाचे दुर्दैव आहे.२०२१-३० पर्यंत उत्तर प्रदेशात नवे लोकसंख्या धोरण लागू राहील. गरीबी आणि निरक्षरतेला वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे. काही समाजांमध्ये लोकसंख्येबाबत जागरूकतेचा अभाव आहे.
यामुळे जनजागृती करण्याची गरज आहे. नवीन लोकसंख्या धोरण २०३० पर्यंत लागू राहील. समाजांमध्ये लोकसंख्येचं संतुलन कायम ठेवण्यासाठी केंद्रीय प्रयत्नांची गरज असल्याचंही योगी सरकारने म्हटलं आहे.
BJP MP Sudhir Gupta alleges that people like Aamir Khan are responsible for population growth
महत्त्वाच्या बातम्या
- समाजवादी पक्षाच्या खासदाराचे अजब तर्कट, लोकसंख्या नियंत्रित झाल्यास युध्दासाठी मनुष्यबळ कसे मिळणार?
- Amit Shah first co opration minister; खाईल त्याला खवखवे आणि “कुणाच्या तरी” मनात चांदणे…!!
- लसीकरण झालेले नाही, तिसरी लाट तोंडावर; शाळा सुरू करण्यास आरोग्यमंत्री राजेश टोपे प्रतिकूल
- Population control : देशाच्या शाश्वत प्रगतीसाठी लोकसंख्या नियंत्रण आवश्यक; पवारांनी मांडली भूमिका, आसामच्या मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन