नाशिक : 25 जून 2025 आणीबाणीच्या काळ्या पर्वाला 50 वर्षे पूर्ण झाले. इंदिरा गांधींनी आपली पंतप्रधानपदाची खुर्ची वाचवण्यासाठी देशावर आणीबाणी लादली. देशातली सगळी अस्वस्थता दाबून टाकली. नागरी स्वातंत्र्य हिरावून घेतले. सार्वजनिक जीवनातून जवळपास निवृत्त झालेले जयप्रकाश नारायण आणि अन्य नेत्यांना “पुनरागमन” करण्याची “संधी” दिली. मात्र याच काळात सर्वसामान्य नागरिकांवर सरकारी यंत्रणांनी अत्याचार केले. दिल्लीतल्या तुर्कमान गेट परिसरात सक्तीची नसबंदी प्रकरण गाजले.
आपल्या अनिर्बंध सत्तेला कुणीही, केव्हाही आणि कुठेही आव्हान देताच कामा नये यासाठी इंदिरा गांधींनी तब्बल 64 कायदे बदलले. त्याची चर्चा फारशी कुठे झाली नाही. त्यांनी 42 वी घटनादुरुस्ती केली. यावर मात्र बराच खल झाला. इंदिरा गांधींनी आणीबाणीच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घातली. त्या विरोधात संघ स्वयंसेवकांनी मोठे आंदोलन उभारले. या आंदोलनादरम्यान 44965 स्वयंसेवकांना अटक झाली त्यांना तुरुंगवास झाला, पण त्यापलीकडे जाऊन तब्बल 100000 पेक्षा अधिक स्वयंसेवकांनी भूमिगत लढा उभारला. या भूमिगत लढ्यामध्ये विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी संघ स्वयंसेवक म्हणून सामील झाले होते. त्यांनी त्यांच्या आठवणी “द इमर्जन्सी डायरीज” मधून शेअर केल्या.
इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीच्या मुद्द्यावर भाजपने काँग्रेसवर तुफानी हल्लाबोल केला. इंदिरा गांधींनी स्वतःची सत्ता वाचवण्यासाठी संपूर्ण देशाला कसे वेठीस धरले होते, शेकडो नेत्यांना आणि हजारो नागरिकांना तुरुंगात कसे डांबले होते, याची सगळी सविस्तर वर्णने केली. आणीबाणीच्या मुद्द्यावर काँग्रेसला बचावाची कुठली संधीच द्यायची नाही याची पुरेपूर “व्यवस्था” केली. दिल्ली सह अनेक ठिकाणी आणीबाणी विरोधातली प्रदर्शने आयोजित केली.
काँग्रेसला द्यावी लागली कबुली
आणीबाणीच्या मुद्द्यावर काँग्रेसला भाजपवर मात करता आली नाही. आणीबाणी मध्ये सर्वसामान्यांवर अत्याचार झाले. ही चूक होती. त्याची कबुली इंदिरा गांधींपासून सगळ्या नेत्यांना द्यावी लागली. पण त्या पलीकडे जाऊन भाजपच्या हल्ला हल्लाबोलाला प्रत्युत्तर देताना काँग्रेसने इंदिरा गांधींच्या come back चे शस्त्र उपसले. 1975 मध्ये ज्या इंदिरा गांधींनी आणीबाणी लादली, त्यांनीच स्वतःहून 1977 मध्ये निवडणूका जाहीर केल्या. त्यासाठी कुणीही त्यांच्यावर दबाव आणला नव्हता याची आठवण काँग्रेस नेत्यांनी करून दिली. त्यानंतर सगळे विरोधक फक्त 28 महिने सरकार चालवू शकले. पण 1980 मध्ये इंदिरा गांधींनी जोरदार come back केले. आणीबाणीतल्या चुका सुधारल्या. त्यामुळे जनतेने त्यांना आधी पेक्षा जास्त कौल दिला, असे समर्थन काँग्रेस नेत्यांनी केले. काँग्रेसचे नेते तारिक अन्वर आणि प्रमोद तिवारी यांनी यासंदर्भात आवर्जून आठवणी सांगितल्या.
दुर्गा टू डिक्टेटर
इंदिरा गांधींचा 1971 ते 1975 असा राजकीय प्रवास “दुर्गा टू डिक्टेटर” असा होता. पण 1977 मध्ये त्यांनी निवडणुका घेतल्या आपण “हुकूमशाहीवादी संजय गांधींच्या आई” असण्यापेक्षा “लोकशाहीवादी नेहरूंच्या कन्या” आहोत, हे इंदिरा गांधींनी सिद्ध केले, असा दावा ज्येष्ठ पत्रकार निरजा चौधरी यांनी केला. 1977 मध्ये निवडणूक घेण्यासाठी इंदिरा गांधींवर कुणी दबाव आणला नव्हता. तुरुंगात असलेल्या आणि विस्कळीत झालेल्या विरोधकांना धक्का देण्यासाठी 18 जानेवारी 1977 रोजी अचानक निवडणुका घेण्याचा निर्णय जाहीर केला होता, हे तथ्य लक्षात घेता चौधरींचा दावा खरा ठरला.
1980 मध्ये come back
1977 मध्ये आलेल्या जनता पक्षाच्या सरकारमध्ये जनसंघ सामील झाला. अटल बिहारी वाजपेयी परराष्ट्र मंत्री झाले होते, तर लालकृष्ण अडवाणी नभोवाणी मंत्री झाले होते. पण इंदिरा गांधींच्या विरोधात उभ्या राहिलेल्या मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंग, बाबू जगजीवन राम यांच्यासारख्या सगळ्या कर्तृत्ववान ज्येष्ठ नेत्यांना 28 महिन्यांपेक्षा जास्त काळ सरकार चालविता आले नव्हते. 1980 मध्ये त्यांना निवडणुका घ्याव्या लागल्या आणि इंदिरा गांधींसमोर पराभव पत्करावा लागला होता.
BJP insists on black days of emergency, Congress claim Indira Gandhi’s come back
महत्वाच्या बातम्या
- नागपूरकरांची स्वप्नपूर्ती; आर्थिक दुर्बल घटकांना 480 घरे वाटप; महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याच्या दिशेने मार्गक्रमण
- World War III : तिसऱ्या महायुद्धाच्या धोक्याची घंटा वाजली! आता चीन अन् रशिया कोणते मोठे पाऊल उचलणार?
- IndiGo flight : ‘मेडे’ कॉलनंतर चेन्नईला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग
- RCB wins : RCBने ट्रॉफी जिंकल्यानंतर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीतून BCCIने घेतला धडा!