हे शब्द मणिशंकर अय्यर यांचे आहेत, पण विचार गांधी घराण्याचा आहे, असंही म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावरून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेस आणि गांधी परिवारावर निशाणा साधला आहे. BJP criticizes Congress on Mani Shankar Iyers statement
संबित पात्रा यांनी गुरुवारी (२४ ऑगस्ट) सांगितले की, हे शब्द मणिशंकर अय्यर यांचे आहेत, पण विचार गांधी घराण्याचा आहे. मणिशंकर अय्यर हे गांधी घराण्याच्या जवळच्या नेत्यांपैकी एक आहेत. मणिशंकर अय्यर यांनी त्यांच्या वक्तव्यातून गांधी घराण्याबद्दलची मते व्यक्त केली आहेत. मणिशंकर अय्यर पुन्हा प्रकट झाले आहेत. ते गांधी घराण्यातील सर्वात जवळचे, गांधी घराण्याच्या मुकुटातील रत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय ”हे तेच मणिशंकर अय्यर आहेत, जे गांधी घराण्याचे मुकुटमणी आहेत, ज्यांनी पंतप्रधान मोदींना नीच म्हटले होते. पाकिस्तानमध्ये नरेंद्र मोदी यांच्या पराभवाचे विधान केले आहे. 2024ची निवडणूक आहे आणि पुन्हा एकदा मुकुटाचा मणी बाहेर पडला आहे. यावेळी त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे.” असंही संबित पात्रा म्हणाले आहेत.
BJP criticizes Congress on Mani Shankar Iyers statement
महत्वाच्या बातम्या
- चांद्रयान मोहिमेसाठी कैलास खेरचं खास गाणं
- काँग्रेसने स्वतःच्याच सर्व्हेत महाविकास आघाडीला 45 जागा देणे म्हणजे आरशाला मेकअप करून त्याच्यासमोर उभे राहणे!!
- Chandrayaan-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरताच पंतप्रधान मोदींनी सर्वात अगोदर कोणाला फोन केला?
- चंद्रयान 3 प्रत्यक्ष चंद्रावर उतरताना त्यावरील हॉरिझोन्टल वेलोसिटी कॅमेराने टिपलेल्या चंद्राच्या “या” छबी!!