• Download App
    मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवार खुशबू यांच्यावर गुन्हा | BJP candidate Khushboo charged with campaigning in front of a mosque

    मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवार खुशबू यांच्यावर गुन्हा

    मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या तमीळनाडूतील थाउजंट लाईटस मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री खुशबू यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भरारी पथकातील अधिकाऱ्याने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. BJP candidate Khushboo charged with campaigning in front of a mosque


    विशेष प्रतिनिधी

    चेन्नई : मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या तमीळनाडूतील थाउजंट लाईटस मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री खुशबू यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भरारी पथकातील अधिकाऱ्याने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.

    फियार्दीत म्हटले आहे की खुशबू आणि त्यांचे समर्थक एका मशिदीसमोर उभे राहून आवश्यक परवानगी न घेता पत्रके वाटताना दिसले. त्यांच्या कृत्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. तक्रार मिळताच कोडमबक्कम पोलिसांनी खुशबू यांच्यावर गुन्हा दाखल केला.


    काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अभिनेत्री खुशबू भाजपात


    प्रसिध्द अभिनेत्री खुशबू यांनी द्रवीड मुनेत्र कळघमच्या (द्रुमुक) प्रवक्त्या होत्या. २०१४ मध्ये त्यांनी कॉँग्रेमध्ये प्रचार केला होता. नुकताच त्यांनी कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मध्य चेन्नई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या थाऊजंट लाईटस या मतदारसंघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचारात अनेक अभिनव तंत्रे वापरली आहेत. चेन्नईतील एका रस्त्यावर त्यांनी डोसे बनवून मतदारांना खाऊ घातले होते. त्याची चांगलीच चर्चा झाली होती.

    BJP candidate Khushboo charged with campaigning in front of a mosque


    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    President Murmu : राष्ट्रपती मुर्मूंनी पाणबुडी INS वाघशीरमधून प्रवास केला, असे करणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रपती

    Lucknow : लखनौमध्ये शियांचे अधिवेशन, मौलाना म्हणाले- वंदे मातरमच्या नावाखाली घाबरवले जातेय, पाकसारखी वागणूक मिळतेय

    Mohan Bhagwat : भागवत म्हणाले- संघाचे ध्येय हिंदू समाजाला एकत्र करणे, सनातन धर्म पुन्हा जिवंत करण्याची वेळ आली आहे