• Download App
    Vijay Rupani, Nirmala Sitharaman महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या येणार मुंबईत!!

    Vijay Rupani, Nirmala Sitharaman : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री निवडण्यासाठी विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन उद्या येणार मुंबईत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत 132 आमदार मिळवल्यानंतर भाजपने महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांच्याकडून काढून घेऊन स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी भाजप घटनेची निवड उद्या मुंबईत होणार असून भाजपचे दोन केंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन इथे येत आहेत.

    गुजरातचे माजी मुख्यमंत्री राहिलेले विजय रूपाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्ती मानले जातात. गुजरातच्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर ते भाजपचे पंजाब मधले प्रभारी बनले. भाजपने त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची निवड सोपविली आहे.

    केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभा निवडणुकीपूर्वी बारामती लोकसभा क्लस्टरच्या प्रभारी होत्या. त्या बारामतीतून सरप्राईज कॅंडिडेट असणार अशी चर्चा माध्यमांमधून त्यावेळी रंगली होती. परंतु स्वतः निर्मला सीतारामन यांनीच लोकसभा निवडणूक लढवायला नकार दिला होता. विजय रुपाने यांच्याबरोबरच निर्मला सीतारामन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या निवडीत सहभागी होणार आहेत.

    दरम्यानच्या काळात आज सागर बंगल्यावर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. प्रवीण दरेकर, गिरीश महाजन आदी नेत्यांचा त्यामध्ये समावेश होता. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्याच नावावर शिक्कामार्फत होणार असल्याच्या बातम्या माध्यमांनी दिले आहेत. परंतु, विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्याकडे असलेल्या चिठ्ठी मध्ये फडणवीस यांचे नाव असेल की दुसरेच कुठले तरी सरप्राईज नाव असेल, याबाबत माध्यमांकडे अधिकृत कुठलीही माहिती नाही.

    BJP appoints Vijay Rupani, Nirmala Sitharaman as central observers for Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Parliament : संसदेच्या अधिवेशनात इराण युद्धाच्या चर्चेवरून गदारोळ, बिर्लांविरोधात प्रस्ताव लांबणीवर, दुसऱ्या टप्प्यात कामकाज ठप्प

    Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात कांदा-लसूणला तामसिक मानण्याची याचिका; सरन्यायाधीशांनी विचारले- मध्यरात्री याचिका तयार करता का? 5 याचिका फेटाळल्या

    PM Modi : मोदी म्हणाले- भारत इनोव्हेशनच्या अर्थव्यवस्थेकडे जात आहे, AI-ऑटोमेशनवर फोकस; मुलींना नव्या संधींमध्ये मागे राहू देणार नाही