दिल्ली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजसाठी सभापतींकडे मागितली परवानगी
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Parliament संसदेच्या मकर गेटजवळ झालेल्या हाणामारी प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. दिल्ली पोलीस आता या प्रकरणाचा तपास पुढे नेतील आणि संसदेच्या संकुलातील सीसीटीव्ही फुटेज गोळा करतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे परवानगी मागितली आहे.Parliament
दिल्ली पोलीस घटनास्थळी सीन रिक्रिएट करू शकतात. याशिवाय पोलीस राहुल गांधी यांना तपासात सहभागी होण्यासाठी नोटीस पाठवण्याची तयारी करत आहेत. जखमी खासदारांचे जबाब घेतल्यानंतर आणि फुटेज मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी जाऊन सीन रिक्रिएट करू शकतील, असे सांगण्यात येत आहे.
19 डिसेंबर 2024 रोजी संसदेत विरोधकांच्या निदर्शनादरम्यान धक्काबुक्की झाली होती. यामध्ये भाजपचे दोन खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत पडून जखमी झाले. यानंतर या दोन खासदारांना राहुल गांधींनी खाली ढकलल्याचा आरोप भाजपने केला होता. 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी भाजपचे खासदार हेमांग जोशी, अनुराग ठाकूर आणि बन्सुरी स्वराज यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी BNS चे कलम 109 (हत्येचा प्रयत्न) काढून आणि तक्रारीत दिलेली इतर सर्व कलमे जोडून गुन्हा नोंदवला.
खरे तर राज्यसभेत संविधानावरील चर्चेदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांवर भाष्य केले होते. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या विधानावर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ केला. अमित शहा यांनी माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, असे विरोधकांनी म्हटले आहे. याविरोधात विरोधकांनी संसदेच्या आवारात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने केली. त्या दिवशी भाजपचे खासदारही काँग्रेसविरोधात निदर्शने करत होते. यादरम्यान बाचाबाची झाली आणि भाजपचे दोन खासदार पडून जखमी झाले.
Big update in Parliament scuffle case Police to recreate scene
महत्वाच्या बातम्या
- Chhagan Bhujbal अजितदादांनी भूमिका मांडल्यानंतरही भुजबळांनी पुन्हा काढले अजितदादांच्या राजकीय नियोजनाचे वाभाडे!!
- Bangladeshis : दिल्लीत अवैध बांगलादेशींना पकडण्यासाठी ऑपरेशन
- Pune book festival : वाचन प्रेमींकडून २५ लाख पुस्तकांची खरेदी ; ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल
- Kejriwal दिल्लीची निवडणूक जिंकली तरी केजरीवाल खुर्ची पासून दूरच; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा!!