भारताने बुधवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी अंदमान निकोबारमध्ये करण्यात आली. या क्षेपणास्त्राने वाढलेल्या पल्ल्याच्या लक्ष्यावर अचूक मारा केला.Big news India’s BrahMos supersonic cruise missile test successful, software extends range
वृत्तसंसथा
नवी दिल्ली : भारताने बुधवारी ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी अंदमान निकोबारमध्ये करण्यात आली. या क्षेपणास्त्राने वाढलेल्या पल्ल्याच्या लक्ष्यावर अचूक मारा केला.
अलीकडेच, ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची रेंज 500 किमीपर्यंत वाढवण्यात यशस्वी आले आहे. यासाठी क्षेपणास्त्रात कोणताही बदल करण्यात आलेला नसून हे अपग्रेड सॉफ्टवेअरच्या मदतीने करण्यात आले आहे. आता क्षेपणास्त्राचा पल्ला 300 किमीवरून 800 किमीपर्यंत वाढला आहे.
अलीकडेच, 9 मार्च रोजी भारतीय लष्कराचे एक नि:शस्त्र क्षेपणास्त्र (शस्त्राशिवाय प्रक्षेपण) चुकून फायर झाल्याने हे क्षेपणास्त्र चर्चेत आले. सुमारे 261 किमी अंतरावर हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या मियां चन्नू भागात पडले. त्यात शस्त्रे नसल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. आपली चूक मान्य करून भारताने उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी केले होते.
Big news India’s BrahMos supersonic cruise missile test successful, software extends range
महत्त्वाच्या बातम्या
- हायटेक बोगदा दिल्लीकरांसाठी तयार ३० मिनिटांचा प्रवास पाच मिनिटांत शक्य
- म्हणून कॉँग्रेसच्या काळात वाढला होता भ्रष्टाचार, ईडी ठेवली होती नावालाच
- ONE NATION ONE FLAG : 75 वर्षात प्रथमच फडकला तिरंगा ! कर्नाटकातील क्लॉक टॉवर-७०वर्ष इस्लामी ध्वज – खासदार मुनिस्वामींची शपथ अन् जिल्हाधिकारी,पोलिसांची साथ…
- नवाब मलिक यांच्यापुढील अडचणी वाढल्या, चार एप्रिलनंतर कोठडीतच करावा लागला मुक्काम