• Download App
    इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा 'हा' मोठा निर्णय|Big decision of Air India in view of Israel Iran War, all flights to Tel Aviv canceled till 30 April

    इस्रायल इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाचा ‘हा’ मोठा निर्णय

    आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे. असं सांगण्यात आलं


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली: इस्रायल आणि इराणमधील तणाव सातत्याने वाढत आहे. दरम्यान, एअर इंडियाने शुक्रवारी तेल अवीव येथून 30 एप्रिल 2024 पर्यंत आपली सर्व उड्डाणे स्थगित केली. एक पोस्ट शेअर करून ही माहिती देताना, एअर इंडियाने म्हटले आहे की, “मध्य पूर्वेतील परिस्थिती लक्षात घेता, तेल अवीवमधून आमची उड्डाणे 30 एप्रिल 2024 पर्यंत स्थगित राहतील. आम्ही सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि एअर इंडियामध्ये आमच्या प्रवाशांना मदत करत आहोत, आमचे ग्राहक आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य आहे.Big decision of Air India in view of Israel Iran War, all flights to Tel Aviv canceled till 30 April



    उल्लेखनीय आहे की, गेल्या रविवारीच एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले होते की, दिल्ली आणि तेल अवीव दरम्यानची थेट उड्डाणे काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत.

    टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाने जवळपास पाच महिन्यांच्या अंतरानंतर 3 मार्च रोजी इस्रायलची राजधानी जेरुसलेमसाठी सेवा पुन्हा सुरू केली होती. इस्रायली शहरावर हमासच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, एअर इंडियाने 7 ऑक्टोबर 2023 पासून प्रथम तेल अवीवची उड्डाणे निलंबित केली होती. एअर इंडिया राष्ट्रीय राजधानी आणि इस्रायल शहरादरम्यान साप्ताहिक चार उड्डाणे चालवते.

    अलीकडच्या काळात अनेक आंतरराष्ट्रीय प्रवासी एअरलाईन्स कंपन्यांनी या कारणास्तव त्यांची उड्डाणे स्थगित केल्याची माहिती आहे. 15 एप्रिल रोजी जर्मन एअरलाइन ग्रुप लुफ्थान्साने इराणच्या इस्रायलवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनंतर अम्मान, बेरूत, एरबिल आणि तेल अवीवची उड्डाणे देखील स्थगित केली.

    Big decision of Air India in view of Israel Iran War, all flights to Tel Aviv canceled till 30 April

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!