धर्मेंद्र प्रधान म्हणाले, मोदींवरील लोकांचा विश्वास वाढला आहे.
विशेष प्रतिनिधी
अंगुल : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ओडिशातील बिजू जनता दल (बीजेडी) चे अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे संबळपूरचे लोकसभा उमेदवार धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.Big blow to BJD in Odisha, many leaders and workers joined BJP
यावेळी धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील लोकांचा विश्वास वाढला आहे, त्यामुळे इतर पक्षांचे सदस्य आणि नेते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. ओरिसा बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि त्यामुळे बीजेडी आणि इतर पक्षांचे लोक भाजपमध्ये सामील होत आहेत. कारण लोकांचा पंतप्रधान मोदींवरील विश्वास वाढत आहे. स्थानिक नेतृत्व आता ‘स्थानिक’ राहिलेले नाही म्हणून मागच्या दाराने घर बळकवण्याचे प्रयत्न सरू आहेत,म्हणून लोक नाराज आहेत. जनता त्या लोकांवर नाराज आहे ज्यांनी राज्याच्या विकासासाठी काम केले नाही पण भ्रष्टाचारात गुंतले आहेत.
प्रधान यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारादरम्यान पल्लाहारा विधानसभा मतदारसंघालाही भेट दिली. यावेळी त्यांनी एका चहाच्या दुकानात जाऊन चहा प्यायला आणि स्थानिक लोकांशी चर्चा केली. भाजपचे उमेदवार धर्मेंद्र प्रधान 15 वर्षानंतर संबलपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. संबळपूरमध्ये 25 मे रोजी मतदान होणार आहे.
ओडिशामध्ये चार टप्प्यात लोकसभा निवडणुका होणार आहेत
ओडिशातील विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकाच वेळी चार टप्प्यात होणार आहेत, पहिला टप्पा 13 मे रोजी, दुसरा टप्पा 20 मे रोजी, तिसरा टप्पा 25 मे रोजी आणि शेवटचा टप्पा 1 जून रोजी होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बीजू जनता दलाला (BJD) सर्वाधिक जागा मिळाल्या, त्यानंतर भाजप आणि काँग्रेसला स्थान मिळाले. बीजेडीने 12 जागा जिंकल्या, भाजप 8 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली.
Big blow to BJD in Odisha, many leaders and workers joined BJP
महत्वाच्या बातम्या
- हेमंत सोरेन यांना पुन्हा धक्का! ED कोर्टाने फेटाळला अंतरिम जामीन
- उज्ज्वल निकमांना उमेदवारी; म्हणे, पूनम महाजनांचा पत्ता कट; पण हा तर खरा त्या पलीकडचा “मास्टर स्ट्रोक”!!
- ममता बॅनर्जींना अटक करा, अन् ‘TMC’ला दहशतवादी संघटना घोषित करा’
- कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!