• Download App
    JDU 'जेडीयू'मध्ये 'हा' पक्ष विलीन झाला; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी खेळी!

    JDU : ‘जेडीयू’मध्ये ‘हा’ पक्ष विलीन झाला; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी खेळी!

    2025 मध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ‘जेडीयू’सातत्याने मजबूत होत आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमध्ये 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या पक्ष, जनता दल (युनायटेड) (जेडीयू) ने 12 जागा जिंकून महत्त्वपूर्ण यश मिळविले होते. या विजयाला पक्षासाठी विशेष महत्त्व आहे, कारण याआधी अनेक लोकांचा असा विश्वास होता की जेडीयू मागे पडली आहे. मात्र या निवडणुकीतील कामगिरीने टीकाकारांचे तोंड गप्प केलेच, पण पक्षाला नवी ऊर्जा आणि आत्मविश्वासही दिला आहे.

    त्याचबरोबर जेडीयूची ही ताकद केवळ लोकसभा निवडणुकीपुरती मर्यादित नाही. 2025 मध्ये होऊ घातलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष सातत्याने मजबूत होत आहे. यापूर्वी इतर पक्षांसोबत असलेले अनेक मोठे नेते आता जेडीयूमध्ये सामील होत आहेत. पक्षाचा वाढता प्रभाव आणि नितीशकुमार यांच्या नेतृत्वावरील विश्वासाचा हा पुरावा आहे.


    Swapnil Kusale : ‘आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे, आपण… ‘ ; ऑलम्पिक पदक विजेत्या स्वप्निल कुसाळेंचं वक्तव्य!


    गुरुवार, 29 ऑगस्ट रोजी भारतीय स्वराज मोर्चा नावाच्या राजकीय पक्षाने आपल्या सर्व कार्यकर्त्यांसह जेडीयूमध्ये विलीन केले. यावेळी भारतीय स्वराज मोर्चाचे प्रमुख उज्ज्वल कुमार वर्मा आणि त्यांच्या समर्थकांनी जेडीयूचे सदस्यत्व घेतले. उज्ज्वल वर्मा यांनी जेडीयूमध्ये परतणे “आपल्या जुन्या घरी परतणे” असे वर्णन केले आणि प्रामाणिकपणे पक्ष मजबूत करण्याचे वचन दिले.

    तसेच, नितीश कुमार यांच्या जवळचे जेडीयू सरचिटणीस आणि माजी आयएएस अधिकारी मनीष वर्मा यांनी उज्ज्वल वर्मा आणि त्यांच्या समर्थकांचे स्वागत केले. मनीष वर्मा म्हणाले की उज्ज्वल वर्मा हे आधी राष्ट्रीय लोक समता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते आणि आता त्यांनी त्यांची संघटना भारतीय स्वराज मोर्चा JDU मध्ये विलीन केली आहे. या विलीनीकरणामुळे जवळपास 200 कार्यकर्ते जेडीयूचा भाग बनले आहेत, ही पक्षासाठी आनंदाची बाब आहे.

    Bharatiya Swaraj Morcha party merged with JDU

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    बिहारमध्ये उद्या निकालाच्या दिवशीच “नेपाळ” + “बांगलादेश” घडवायची लालूंच्या पक्षाची तयारी; दमबाजी करणाऱ्या नेत्याविरुद्ध FIR!!

    Air India : एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी; टिश्यू पेपरवर लिहिले- BOMB गूड बाय, वाराणसी विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

    Kangana Ranaut : कंगना रणौतवर देशद्रोहाचा खटला चालणार; शेतकरी आंदोलनात रेप-हत्या झाल्याचे म्हटले होते; सुनावणी आग्रा न्यायालयात