• Download App
    बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार-जाळपोळ, मतपत्रिका जाळल्या; 24 तासांत 4 ठार; मतदार म्हणाले- केंद्रीय फौजफाटा येईपर्यंत मतदान करणार नाही|Bengal Panchayat Elections Violence-Arson, Ballot Papers Burned; 4 killed in 24 hours; Voters said - they will not vote until the central army arrives

    बंगाल पंचायत निवडणुकीत हिंसाचार-जाळपोळ, मतपत्रिका जाळल्या; 24 तासांत 4 ठार; मतदार म्हणाले- केंद्रीय फौजफाटा येईपर्यंत मतदान करणार नाही

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालमधील 22 जिल्ह्यांतील 73,887 ग्रामपंचायतीपैकी 64,874 जागांसाठी शनिवारी सकाळी 7 वाजता मतदान सुरू आहे. केंद्रीय दलाच्या तैनातीनंतरही वेगवेगळ्या भागातून जाळपोळ, हिंसाचार आणि मतपत्रिका जाळल्याच्या बातम्या येत आहेत. निवडणुकीतील हिंसाचारात गेल्या 24 तासांत चार जणांचा मृत्यू झाला आहे.Bengal Panchayat Elections Violence-Arson, Ballot Papers Burned; 4 killed in 24 hours; Voters said – they will not vote until the central army arrives

    सर्वाधिक चकमकी आणि हिंसाचार मुर्शिदाबाद जिल्ह्यातून झाला आहे. बेलडांगा आणि तुफानगंज येथे शनिवारी सकाळी प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला. अशीच घटना रेळीनगर येथे शुक्रवारी रात्री घडली. येथे झालेल्या बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू झाला. हे तीन कार्यकर्ते त्यांच्या पक्षाचे असल्याचा दावा टीएमसीने केला आहे.



    तर दुसरीकडे खारग्राम गावात काँग्रेस कार्यकर्त्याची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. सकाळी मतदानाला सुरुवात होताच कूचबिहारच्या सीताई येथील बारावीता प्राथमिक शाळेतील मतदान केंद्राची तोडफोड करण्यात आली आणि मतपत्रिका जाळण्यात आल्या.

    त्याचवेळी राज्यात पंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यानंतर म्हणजेच 9 जूननंतर झालेल्या हिंसक घटनांमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे.

    मतदान सुरू होण्यापूर्वीच लांबच लांब रांगा लागल्या

    बंगाल पंचायत निवडणुकीत लोकांमध्ये मतदानाबाबत प्रचंड उत्साह दिसून आला. येथून समोर आलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये मतदान सुरू होण्यापूर्वीच लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दक्षिण 24 परगणा येथील बसंती भागात पावसात लोक छत्री घेऊन उभे होते. मतदारांमध्ये महिलांची संख्या अधिक दिसून आली.

    9,013 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत
    राज्यात एकूण 73,887 ग्रामपंचायतींच्या जागा आहेत, त्यापैकी 9,013 जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. बिनविरोध निवडून आलेले सर्वाधिक 8,874 उमेदवार तृणमूल काँग्रेसचे आहेत. तर भाजपचे 63, काँग्रेसचे 40 आणि सीपीएमचे 36 उमेदवार बिनविरोध निवडून आले.

    2018च्या पंचायत निवडणुकांची आकडेवारी पाहिली तर 58,692 जागांपैकी 20,078 म्हणजेच 34.2% जागा बिनविरोध झाल्या होत्या. यातील जवळपास सर्वच जागा टीएमसीने जिंकल्या होत्या.

    Bengal Panchayat Elections Violence-Arson, Ballot Papers Burned; 4 killed in 24 hours; Voters said – they will not vote until the central army arrives

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!