• Download App
    'दक्ष राहा आणि मतमोजणी निःपक्षपातीपणे करा', मतमोजणीपूर्वी दिग्विजय सिंह यांचे विधान!|Be careful and do the counting impartially Digvijay Singhs statement before the counting of votes

    ‘दक्ष राहा आणि मतमोजणी निःपक्षपातीपणे करा’, मतमोजणीपूर्वी दिग्विजय सिंह यांचे विधान!

    काँग्रेसच्या मतमोजणी प्रतिनिधींना खास आवाहन केले आहे.


    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकी पैकी चार राज्याचे निकाल आज, रविवारी (3 डिसेंबर) लागत आहेत. मिझोराम निवडणुकीची मतमोजणी सोमवारी होणार आहे. त्याआधी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी काँग्रेसच्या मतमोजणी प्रतिनिधींना खास आवाहन केले आहे.Be careful and do the counting impartially Digvijay Singhs statement before the counting of votes



    निवडणुकीच्या वेळी कोणत्याही प्रकारची हेराफेरी होऊ नये यासाठी त्यांनी अधिक दक्ष राहण्यास सांगितले आहे. रविवारी सकाळी त्यांनी मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर लिहिले, ”काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. काँग्रेसच्या सर्व मतमोजणी प्रतिनिधींना विनंती आहे की त्यांनी मतमोजणी काळजीपूर्वक आणि न्याय्य पद्धतीने पार पाडावी.”

    मतमोजणीपूर्वी गुरुवारी (३० नोव्हेंबर) जारी झालेल्या एक्झिट पोलमध्ये पुन्हा एकदा मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याचा दावा करण्यात आला आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलने पुन्हा एकदा राज्यात भाजपचे सरकार येण्याचा अंदाज वर्तवला आहे.

    सरसंघचालक गोळवलकर गुरुजींवर दिग्विजय सिंहांचे विखारी ट्विट, द्वेष पसरवल्याच्या आरोपावरून एफआयआर दाखल

    तर भाजपच्या नेत्यांना त्यांच्या विजयाबद्दल पूर्ण विश्वास आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले होते की राज्यात भाजपचे सरकार परत येईल, तर पक्षाचे आणखी एक मोठे नेते आणि राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले होते की एक्झिट पोलनुसार काँग्रेस राज्यातून बाहेर पडत आहे.

    Be careful and do the counting impartially Digvijay Singhs statement before the counting of votes

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार