शिवसेनेशी संघर्ष करण्यासाठी नाही तर देशविरोधी विचारांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष लढत आहे. सध्याची शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी टी राव यांनी केला आहे.अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा Be aware that a situation like Afghanistan should not happen in Maharashtra. C.T.Rao’s appeal
विशेष प्रतिनिधी
ठाणे : शिवसेनेशी संघर्ष करण्यासाठी नाही तर देशविरोधी विचारांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष लढत आहे. सध्याची शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालत नसल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी सी टी राव यांनी केला आहे.
अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा,असे आवाहनही त्यांनी केले. ठाण्यात‘मन की बात’ या कार्यक्रमासाठी आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते.
रवी म्हणाले, भाजप शिवसेनेसोबत संघर्ष करण्यासाठी नाही, देश विरोधी विचारांच्या विरोधी आहे, शिवसेना देश विरोधी नाही. मात्र, शिवसेना आपल्या विचारांच्या तसेच बाळासाहेबांच्या विचारांच्या खूप लांब गेली आहे का? याचा विचार करण्याची खरी आज गरज आहे.
नारायण राणे केवळ मंत्री नाही तर ते भाजपचे नेतेही आहेत. त्यांच्या वक्तव्याला पार्टीचे समर्थन नाही, पण त्यांच्या सोबत आम्ही आहोत, असे सांगून रवी म्हणाले, भाजप देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेसोबत आहे. जनतेच्या सुख दु:खा सोबत आहे. अफगाणिस्तानारखी स्थिती महाराष्ट्रात होऊ नये, यासाठी जागरूक रहा.