• Download App
    Bangladesh बांगलादेशने केला मोठा दावा, म्हटले 'शेख हसीना

    Bangladesh : बांगलादेशने केला मोठा दावा, म्हटले ‘शेख हसीना यांच्या पक्षाचे लाखो सदस्य भारतात पळून गेले’

    Bangladesh

    अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी असा दावा केला आहे


    विशेष प्रतिनिधी

    ढाका: Bangladesh बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे माहिती सल्लागार महफुज आलम यांनी असा दावा केला आहे की पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षाचे एक लाखाहून अधिक सदस्य भारतात पळून गेले आहेत. आलम यांचे हे विधान माध्यमांमध्ये आले आहे. बांगलादेशी न्यूज पोर्टल bdnews24.com नुसार, हसीनाच्या कार्यकाळात बेपत्ता झालेल्या किंवा मारल्या गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांनी आयोजित केलेल्या ईद समारंभात आलम यांनी हे विधान केले.Bangladesh

    मानवाधिकार गट ‘मेयर डाक’ ने तेजगाव परिसरात हा कार्यक्रम आयोजित केला होता. सरकारी वृत्तसंस्था बीएसएसनुसार, हसीनावर टीका करताना महफुज आलम यांनी म्हटले की, त्यांना आपल्या आई-वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लोकांना जबरदस्तीने बेपत्ता केले अन् ठार मारले.



    अलिकडेच बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी त्या पोलिसांच्या विधवांशी व्हर्च्युअल संवाद साधला ज्यांचे पती निदर्शकांच्या हल्ल्यात मारले गेले. संवादादरम्यान, त्यांनी बांगलादेशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचा निषेध केला आणि सांगितले की नोबेल पारितोषिक विजेते युनूस यांनी देशाला दहशतवादी राष्ट्र बनवले आहे. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबांना मदत केली जाईल आणि मारेकऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले होते.

    युनूस सरकारवर टीका करताना हसीना म्हणाल्या होत्या की बांगलादेशातील जनता वाढत्या किमतींच्या ओझ्याखाली दबली जात आहे. त्यांनी म्हटले होते की, हे सरकार लोकशाही पद्धतीने निवडून आलेले नसल्याने, त्याची जनतेप्रती कोणतीही जबाबदारी नाही. त्यांचे मुख्य उद्दिष्ट मुक्ती संग्राम आणि मुक्ती समर्थक शक्तींचा आत्मा आणि आवाज दाबणे आहे.

    Bangladesh made a big claim, saying Lakhs of members of Sheikh Hasina’s party fled to India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Judge Cash case : जज कॅश केस, सरन्यायाधीशांनी PM-राष्ट्रपतींना अहवाल सोपवला; तीन न्यायाधीशांच्या समितीकडून चौकशी

    अमेरिका + पाकिस्तान यांनीच ceasefire शब्द वापरला; भारताने फक्त firing आणि military action थांबविल्याचे सांगितले; याचा नेमका अर्थ काय??

    Indian Army पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यानंतरच भारताने सध्या थांबविले फायरिंग; भारतीय सैन्य दलांचा स्पष्ट खुलासा; शस्त्रसंधी शब्द नाही वापरला!!