महाराष्ट्रातील काही शहरांत नियोजनबद्ध पद्धतीने हिंसाचार झाला. या संबंध घटनाक्रमामागे रजा अकादमी व अन्य सहा संघटना आहेत. रजा अकादमीवर निर्बंध घालून, पीडितांची नुकसानभरपाई त्यांच्याकडून वसूल केली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद परांडे यांनी केली. रविवारी ते धंतोली येथील विहिंपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.Ban on Reza Academy, demand of Vishwa Hindu Parishad
विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रातील काही शहरांत नियोजनबद्ध पद्धतीने हिंसाचार झाला. या संबंध घटनाक्रमामागे रजा अकादमी व अन्य सहा संघटना आहेत. रजा अकादमीवर निर्बंध घालून, पीडितांची नुकसानभरपाई त्यांच्याकडून वसूल केली जावी, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष मिलिंद परांडे यांनी केली. रविवारी ते धंतोली येथील विहिंपच्या कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.
त्रिपुरा येथील घटनेला उचलून धरत रजा अकादमी व अन्य सहा संघटनांनी अमरावती, मालेगाव, नांदेड शहरात मोर्चा काढत हिंदूंची घरे, व्यापारी प्रतिष्ठानांवर पोलिसांच्या देखत हल्ला बोलला. अचानक झळकलेले बॅनर्स आणि सोशल मीडियावरील संदेशांवरून या घटना पूर्णत: सुनियोजित होत्या.
बांगलादेशातील हिंदूंचे हत्याकांड संतापजनक, शांतीसेना पाठविण्याची विहिंपची मागणी
मात्र, यावेळी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. शासन-प्रशासन आपल्या सुरक्षेत हयगय करीत असल्याचे दिसून येत असल्याने नागरिकांनी मोर्चा काढला. मात्र, गुन्हेगारांना सोडून पीडितांवरच पोलिसांनी लाठीचार्ज केला, असा आरोप परांडे यांनी केला.
Ban on Reza Academy, demand of Vishwa Hindu Parishad
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील हिंसाचाराचे पाकिस्तानी कनेक्शन? आतापर्यंत 100 हून अधिक एफआयआर, 25 जणांना अटक, वाचा सविस्तर…
- रझा अकादमी म्हणजे काय? : धार्मिक प्रकाशन करणारी संस्था ते दंगलींपर्यंतचा प्रवास, आझाद मैदानाची दंगल ते सध्याचा हिंसाचार, वाचा सविस्तर…
- बालविवाह रोखण्यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे ; राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
- “ज्यांनी जे काम केले आहे त्यांना त्याचे श्रेय त्यांनाच दिले पाहिजे” – अजित पवार
- कोल्हापूर विमानतळावरील अनियमित विमानसेवेमुळे प्रवाशांमध्ये नाराजी