• Download App
    वाहन उद्योगात तेजीचे वारे, प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४२ टक्के वाढ|Automotive industry flourishing, 42 per cent increase in passenger vehicle sales

    वाहन उद्योगात तेजीचे वारे, प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४२ टक्के वाढ

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : देशाची अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यात मोदी सरकार यशस्वी होत असून हा विश्वास असल्याने वाहन उद्योगात तेजीचे वारे वाहू लागले आहे. प्रवासी वाहनांच्या विक्रीत ४२ टक्के वाढ झाली आहे.Automotive industry flourishing, 42 per cent increase in passenger vehicle sales

    फेडरेशन ऑ फ ऑटोमोबाइल डिलर्स असोसिएशन्सच्या (फाडा) वतीने जारी करण्यात आलेल्या जुलैमध्ये प्रवासी वाहनांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जुलैमध्ये प्रवासी वाहनांची शोरूम विक्री ४२.१४ वाढून २,६१,७४४ वाहनांवर गेली. जूनमध्ये ती १८४,१३४ वाहने इतकी होती.



    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र दिल्ली, हरियाणा, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांच्या सरकारने कडक लॉकडाऊन सदृश उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे वाहन उद्योग धास्तावला होता. कडक निबंर्धांमुळे वाहनांची विक्री ठप्प झाली होती. अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद केले होते. बजाज ऑटोने मर्यादित क्षमतेसह उत्पादन सुरू ठेवले होते.

    आता भारतातील कोविड संसर्ग कमालीचा घसरल्यामुळे सर्व बाजार सुरू झाले आहेत.मार्च व मे २०२० मध्ये देशातील बहुतांश वाहन प्रकल्प बंद होते. काही ठिकाणी तर जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्पादन बंद होते.

    फाडाचे अध्यक्ष विंकेश गुलाटी यांनी सांगितले की, बहुतांश राज्यांनी जूनमध्ये कोविड निर्बंध शिथिल केले. त्यामुळे जुलैमध्ये विक्रीत वाढ झाली. सर्वच श्रेणीतील वाहनांची विक्री वाढली असली तरी प्रवासी वाहनांच्या विक्रीचा आलेख सर्वाधिक उंच राहिला. कोविडकाळात बंधनकारक ठरलेले सामाजिक अंतर आणि कौटुंबिक सुरक्षेला आलेले महत्त्व यामुळे लोक वैयक्तिक वाहन खरेदीस प्राधान्य देत आहेत.

    Automotive industry flourishing, 42 per cent increase in passenger vehicle sales

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार