• Download App
    Atiq Ahmed : उमेश पाल अपहरण प्रकरणात आज माफिया अतिकच्या शिक्षेवर सुनावणीAtiq Ahmed to be produced in Prayagraj court today security deployed outside Umesh Pal residence

    Atiq Ahmed : उमेश पाल अपहरण प्रकरणात आज माफिया अतिकच्या शिक्षेवर सुनावणी

    उमेश पालच्या घराबाहेर पोलिसांनी सुरक्षा वाढवली

    विशेष प्रतिनिधी

    प्रयागराज :  उमेश पाल अपहरण प्रकरणातील अतिक अहमद आणि त्याच्या भावासह १० आरोपींविरुद्ध विशेष एमपी एमएलए कोर्टाचा निर्णय आज येणार आहे. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांना सोमवारी संध्याकाळी कडक सुरक्षा व्यवस्थेत नैनी मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात आले होते. Atiq Ahmed to be produced in Prayagraj court today security deployed outside Umesh Pal residence

    या १७ वर्ष जुन्या अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमीव उमेश पाल यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोस्त ठेवण्यात आला आहे. तर न्यायाच्या प्रतीक्षेत असलेले उमेश पाल यांचे कुटुंबीयही माफिया अतिक अहमदच्या मृत्यूला फाशीची शिक्षा व्हावी अशी याचना करत आहेत.

    उमेश पालची आई आणि पत्नीची प्रतिक्रिया –

    न्यायालयाच्या निर्णयापूर्वी उमेश पालची आई शांती देवी यांनी प्रयागराजमध्ये सांगितले की, ‘’माझ्या मुलाने खूप संघर्ष केला आहे. तर तुरुंग म्हणजे अतीक अहमदचे घर आहे आणि तिथून तो काहीही करू शकतो. प्रशासनाने आतापर्यंत जे काही केले त्यात आम्ही समाधानी आहोत. माझी एकच मागणी आहे की त्याला फाशी द्यावी.’’ तर, ‘’त्याला (अतीक अहमद) फाशी द्यावी, अशी माझी न्यायालयाकडून अपेक्षा आहे. मूळ संपेपर्यंत काहीही होणार नाही. आम्ही भीतीने जगत आहोत.’’, असं उमेश पाल यांची पत्नी जया पाल म्हणाल्या आहेत.

    Atiq Ahmed to be produced in Prayagraj court today security deployed outside Umesh Pal residence

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे