पंतप्रधान मोदी हे कट्टरपंथी मुस्लिमांच्या विरोधात आहेत, समुदायाच्या विरोधात नाहीत, असंही आठवले म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
Love Jihad केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्र सरकारच्या “लव्ह जिहाद” रोखण्यासाठी कायदा तयार करण्याच्या निर्णयाला विरोध केला. महाराष्ट्र सरकारने एक शासकीय ठराव जारी केला आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की पोलिस महासंचालक (डीजीपी) यांच्या अध्यक्षतेखालील एक समिती “लव्ह जिहाद” आणि सक्तीने धर्मांतर करण्याच्या तक्रारींवर कारवाई करण्यासाठी उपाययोजना सुचवेल. ही समिती इतर राज्यांमध्ये बनवलेल्या कायदेशीर बाबी आणि कायद्यांचाही विचार करेल आणि अशा घटना रोखण्यासाठी कायदे करण्याची शिफारस करेल.Love Jihad
तर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी मीडियाशी बोलताना सांगितले की, “आंतरधार्मिक विवाहाला लव्ह जिहाद म्हणणे चुकीचे आहे. धर्मांतर थांबवण्यासाठी तरतुदी असाव्यात. सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडू नये यासाठी पावले उचलली पाहिजेत.
याचबरोबर आठवले म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वांना समानतेने वागवतात आणि सर्वांसाठी कल्याणकारी उपाययोजना सुरू केल्या आहेत. मुस्लिमांनाही याचा फायदा झाला आहे. पंतप्रधान मोदी हे कट्टरपंथी मुस्लिमांच्या विरोधात आहेत, समुदायाच्या विरोधात नाहीत.”
तत्पूर्वी, नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, आंतरधर्मीय विवाहात काहीही चूक नाही, परंतु फसवणूक करून आणि ओळख लपवून लग्न करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
Athawales stand against Maharashtra government’s move on Love Jihad law
महत्वाच्या बातम्या
- Chhattisgarh छत्तीसगडमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचा दणदणीत विजय
- Terrible accident : महाराष्ट्रातून अयोध्येला निघालेल्या भाविकांच्या मिनीबसचा पूर्वांचल एक्सप्रेसवेवर भीषण अपघात
- Jayalalithaa : जयललितांची जप्त मालमत्ता तामिळनाडू सरकारकडे हस्तांतरित करण्याचे आदेश
- Trump-Musk : अमेरिकेच्या 14 राज्यांत ट्रम्प-मस्क यांच्यावर खटला; टेस्ला प्रमुखांना अमर्यादित अधिकार, हे लोकशाहीसाठी धोक्याचे