• Download App
    Assam Assembly Elections Results : आसाममध्ये ना प्रियांकांची जादू चालली, ना बघेलांचा डाव; पुन्हा येताना दिसतेय भाजप सरकार । Assam Assembly Elections Results neither Priyanka's magic worked, nor Baghela's Stratergy; BJP government seems to be coming again

    Assam Assembly Elections Results : आसाममध्ये ना प्रियांकांची जादू चालली, ना बघेलांचा करिष्मा; पुन्हा एकदा भाजप सरकार

    Assam Assembly Elections Results : आसाम विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा एकतर्फी विजय नोंदवताना दिसत आहे. आसाममध्ये भाजप युती पूर्ण बहुमताने सत्तेत परतत आहे. तर कॉंग्रेसची आघाडी पुन्हा एकदा जुन्या आकडेवारीकडे झुकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि 5 वर्षांत झालेली विकासकामे ही भाजपच्या पुनरागमनामागील मुख्य कारणे ठरली. दुसरीकडे, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या आकांक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. आसाममध्ये ना प्रियांका गांधींचा चेहरा चालला, ना भूपेश बघेल यांचा करिष्मा चालला.


    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसाम विधानसभा निवडणुकीत भाजप पुन्हा एकदा एकतर्फी विजय नोंदवताना दिसत आहे. आसाममध्ये भाजप युती पूर्ण बहुमताने सत्तेत परतत आहे. तर कॉंग्रेसची आघाडी पुन्हा एकदा जुन्या आकडेवारीकडे झुकत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा आणि 5 वर्षांत झालेली विकासकामे ही भाजपच्या पुनरागमनामागील मुख्य कारणे ठरली. दुसरीकडे, प्रियांका गांधी आणि राहुल गांधी यांच्या आकांक्षांवर पुन्हा एकदा पाणी फिरले आहे. आसाममध्ये ना प्रियांका गांधींचा चेहरा चालला, ना भूपेश बघेल यांचा करिष्मा चालला.

    आसाम विधानसभा निवडणुकीत एकूण 126 जागांसाठी निवडणुका घेण्यात आल्या. सकाळी साडेदहा वाजेपर्यंत 113 जागांच्या ट्रेंडमध्ये एनडीएची 76 जागांवर आघाडी, तर कॉंग्रेसची 36 जागांवर आघाडी होती. त्याच वेळी 2 जागा इतरांच्या मिळू शकतात. अशा प्रकारे मागील निवडणुकीप्रमाणे भाजपही निकालाची पुनरावृत्ती करताना दिसत आहे. त्याचवेळी एआययूडीएफ, बीपीएफ आणि डाव्या पक्षाशी असलेली कॉंग्रेसची युती या वेळेस कामी आली नाही.

    आसाम विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधींनी कॉंग्रेसची सूत्रे हाती घेतली होती. आसाम निवडणुकीसाठी त्यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर जबाबदारी सोपवली होती. बघेल यांनी आसाममध्ये तळ ठोकला होता आणि आपल्या राज्यातील सर्व नेत्यांना प्रचारात जुंपले होते. असे असूनही बघेल यांचा प्रभाव चालू शकला नाही, तर प्रियंका गांधींचा चेहराही पक्षासाठी काम करू शकला नाही. प्रियांका गांधींनी आसामात पूर्ण ताकद पणाला लावली होती, तरीही पक्षाला विजय मिळवता आलेला नाही.

    दुपारी 1 वाजेचा आसामचा निवडणूक आयोगाचा अधिकृत कल व निकाल

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : ममता बॅनर्जी म्हणाल्या- निवडणूक आयोगाने 6 पत्रांना उत्तर दिले नाही; निवडणुकीच्या अगदी आधी SIR का?

    Rupee Gains : डॉलरच्या तुलनेत रुपया 130 पैशांनी मजबूत, 90.20 वर आला; 3 वर्षांतील सर्वात मोठी वाढ, 2025 मध्ये सर्वात कमकुवत आशियाई चलन बनले होते

    New Baggage Rules 2026 : आता परदेशातून ₹75,000 पर्यंतचे सामान ड्यूटी-फ्री आणता येईल; दागिन्यांचे नियम बदलले, लॅपटॉपवरही सूट; नवीन बॅगेज नियम लागू