विशेष प्रतिनिधी
जयपूर – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी ईशान्येतील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर परिस्थिती अचानक का बिघडली याविषयी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशातील जनतेला विश्वासात घेऊन खुलासा केला पाहिजे अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.Ashok Gehlote targets BJP
ते म्हणाले, मिझोराम आणि आसाम यांच्यातील सीमावादावर केंद्र सरकारने लवकर तोडगा काढलाच पाहिजे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली पाहिजे. या दोन राज्यांमधील तणाव हा तीव्र चिंतेचा मुद्दा आहे.
आपल्या नागरिकांनी दुसऱ्या राज्यात प्रवास करू नये अशी मार्गदर्शक सूचना देशाच्या इतिहासात प्रथमच एका राज्याने जारी केली आहे. मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि त्या राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदविला आहे. सीमेवर सुरक्षा दलांचे जवान प्रचंड संख्येने तैनात करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
Ashok Gehlote targets BJP
महत्त्वाच्या बातम्या
- सरन्यायाधिशाच्या नियुक्तीविरोधात खोडसाळपणे याचिका करणाऱ्याला पाच लाख रुपये दंड, व्यावसायिक याचिकाकर्त्यांना न्यायालयाचा दणका
- प्रशांत किशोर म्हणतात राहूल गांधींशी मतभेद, मोदींना हरविण्यापेक्षा पक्ष पुन्हा उभा करण्यावर त्यांनी द्यावा भर
- व्होट बॅँकेच्या राजकारणाला भाजपा घाबरत नाही, अमित शहा यांनी दिला इशारा
- महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे पण त्याची सुरूवात तुमच्या मालकाच्या कलानगरातून करा, संजय राऊतांवर टीका करताना नितेश राणे यांचा आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू