• Download App
    अमित शहांच्या दौऱ्यानंतरच ईशान्य भारतातील परिस्थीती का बिघडली – अशोक गेहलोत यांचा भाजपला सवाल |Ashok Gehlote targets BJP

    अमित शहांच्या दौऱ्यानंतरच ईशान्य भारतातील परिस्थीती का बिघडली – अशोक गेहलोत यांचा भाजपला सवाल

    विशेष प्रतिनिधी

    जयपूर – केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी ईशान्येतील आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यानंतर परिस्थिती अचानक का बिघडली याविषयी भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने देशातील जनतेला विश्वासात घेऊन खुलासा केला पाहिजे अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.Ashok Gehlote targets BJP

    ते म्हणाले, मिझोराम आणि आसाम यांच्यातील सीमावादावर केंद्र सरकारने लवकर तोडगा काढलाच पाहिजे. त्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली पाहिजे. या दोन राज्यांमधील तणाव हा तीव्र चिंतेचा मुद्दा आहे.



    आपल्या नागरिकांनी दुसऱ्या राज्यात प्रवास करू नये अशी मार्गदर्शक सूचना देशाच्या इतिहासात प्रथमच एका राज्याने जारी केली आहे. मिझोराम पोलिसांनी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा आणि त्या राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध प्राथमिक चौकशी अहवाल नोंदविला आहे. सीमेवर सुरक्षा दलांचे जवान प्रचंड संख्येने तैनात करण्यात आले आहेत. यामुळे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

    Ashok Gehlote targets BJP

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट